Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
मुस्लिम महिलांना मिळाला सन्मान

व्हिएस न्यूज - सर्वोच्च न्यायालयाने महिलांच्या दृष्टीने अन्यायकारक अशी मुस्लीम समाजातील ‘ट्रिपल तलाक’ची प्रथा अवैध ठरविल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने गुरुवारी असा तलाक देणे हा फौजदारी गुन्हा ठरवून त्यासाठी पतीला तुरुंगात पाठविण्याची तरतूद असलेले विधेयक बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतले.

या विधेयकाला काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांचा विरोध व दुरुस्त्या नाकारून मंजुरी मिळाली असली तरी सत्ताधा-यांचे बहुमत नसलेल्या राज्यसभेत ते मंजूर करून घेण्यात सरकारचा कस लागेल. काँग्रेससह संपूर्ण विरोधी पक्षाने विधेयकावरील चर्चेच्या वेळी या विधेयकाच्या स्वरूपावर आक्षेप घेतला. ‘ट्रिपल तलाक’ची प्रथा बंद व्हायला हवी, या बाजूचे काँग्रेस,अण्णाद्रमुक, डावे पक्ष, सपा, आरएसपी, राजद, बीजेडी यांच्यासह अन्य पक्ष दिसले. पण त्यांचा हा फौजदारी गुन्हा ठरवून त्यासाठी शिक्षेची तरतूद करण्यावर आक्षेप होता. विधेयक सविस्तर विचार विनिमयासाठी संसदीय समितीकडे पाठविले जावे व नंतर ते एकमताने मंजूर करता येईल, असे त्यांचे म्हणणे होते.

रविशंकर प्रसाद म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही जर असे तलाक दिले जात असतील तर त्यावर काय कारवाई करावी यासाठी प्रचलित कायद्यात कोणतीही तरतूद नसल्यामुळे हे विधेयक संसदेने मंजूर करुन त्याला कायदेशीर स्वरुप द्यावे. त्यामुळे महिलांची मुस्लिम पुरुषांच्या अत्याचारापासून सुटका होऊ शकेल.

सरकार घाईघाईने हा निर्णय घेत आहे. त्याऐवजी सरकारने सर्व पक्षांशी चर्चा करुन एक परिपूर्ण विधेयक सभागृहात मांडायला हवे असे काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे, सुष्मिता देव, आरएसपीचे एन. के. प्रेमचंद्रन,एमआयएमचे सदस्य असद्दुद्दीन ओवैसी, सपाचे धर्मेंद्र यादव, आरजेडीचे जयप्रकाश यादव या सदस्यांनी पुन्हा पुन्हा सांगितले. या सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला की,ऐवढी काय घाई आहे की, हे विधेयक सरकार आजच मंजूर करु इच्छिते.

...Read More

V. S. News
खा. अग्रवालांची जीभ कापणाऱ्याला १० लाखांचा पुरस्कार

व्हिएस न्यूज - समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार नरेश अग्रवाल यांनी पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर सध्या बरेच अडचणीत आले आहेत. अलाहाबादमध्ये त्यांच्याविरोधात राष्ट्रीय हिंदू संघटनने जोरदार आंदोलन केले. त्यांच्या पुतळ्याचे दहनही यावेळी करण्यात आले. त्याचबरोबर त्यांची जीभ कापून जो कोणी आणेल त्याला १० लाखांचा पुरस्कार देण्यात येईल अशीही घोषणा या संघटनेने केली आहे.

दहशतवादी म्हणून कुलभूषण जाधव यांचा उल्लेख करणे ही अतिशय शरमेची बाब असून त्यांनी यापुढे अशाप्रकारची वादग्रस्त विधाने करु नयेत यासाठी त्यांची जीभ कापली गेली पाहिजे. असे वक्तव्य या संघटनेचे संयोजक सत्येंद्र सिंह यांनी केले आहे. त्यांनी याचवेळी नरेश अग्रवाल यांची जीभ कापून आणणाऱ्याला १० लाखांचे बक्षीसही जाहीर केले आहे. तसेच या आंदोलनावेळी नरेश अग्रवाल यांचे राज्यसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली.

...Read More

V. S. News
राजकीय फायद्यासाठीच भाजपवाले खोटे बोलतात

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आरोप

व्हिएस न्यूज – राजकीय फायद्यासाठी भाजप खोटे बोलत असून त्यांच्यामुळे आज देशाला धोका निर्माण झाला आहे, शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेला भाजपपासून धोका आहे. घटना बदलण्यासाठी भाजप गुपचूप कारस्थान करत असल्याचा आरोप कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.

काँग्रेस पक्षाला १३३ र्वष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते. अध्यक्ष म्हणून पक्षाच्या स्थापना सोहळ्याला राहुल यांनी पहिल्यांदाच संबोधित केलं. आपल्या देशाची पायाभरणी करणा-या घटनेलाच आज भाजपपासून धोका निर्माण झाला आहे. भाजपचे नेतेही त्यावर उघडपणे प्रतिक्रिया देत आहेत. घटना बदलण्यासाठी गुपचूप कारस्थानं सुरू असून घटनेला वाचविण्याची आपल्यावरच जबाबदारी असल्याचंही राहुल यांनी सांगितलं. ह्यआज देशाशी धोकेबाजी केली जात आहे.

भाजप राजकीय फायद्यासाठी खोटं बोलत असून त्यांच्यात आणि आपल्यात हाच फरक आहे. आपण भलेही काही चांगलं केलं नसेल, भलेही आपण निवडणुकांमध्ये पराभूत झालो असू. पण आपण सत्याची कास सोडता कामा नये, असं आवाहनही त्यांनी केलं. दरम्यान, राहुल यांनी बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना ह्यजेटलाइ ( जेट असत्य) असं संबोधून त्यांची संभावना केली होती.

...Read More

V. S. News
अमरावतीत शिक्षण मंत्र्यांना दाखविले काळे झेंडे

व्हिएस न्यूज -राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना अमरावतीत विद्यार्थ्यांसह विविध शिक्षण संघटनांच्या रोषाचा बुधवारी सामना करावा लागला. अखिल भारतीय विद्यार्थी संघ (एआयएसएफ), अभाविपचे कार्यकर्ते, विद्यार्थी तसेच शिक्षण संघर्ष संघटनेने अमरावतीमध्ये विविध ठिकाणी त्यांच्याविरोधात निदर्शने केली.

कंपन्यांना शाळा सुरू करण्यास मुभा देण्याचा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १३५४ शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शिक्षणाच्या खासगीकरणाचा निर्णयाचा विरोध करत एआयएसएफच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांचे वाहन अडवले. शिक्षणाच्या कंपनीकरणाचा विरोध करत एआयएसएफच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. निवड प्रक्रियेनुसार विद्यार्थी संघाच्या निवडणूका रद्द करण्याच्या मागणीला घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून (अभाविप) निवेदन देण्यात आले. खुल्या पद्धतीने विद्यार्थी संघाची निवडणूक घेण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. शिष्यवृत्ती अर्ज भरताना येणारी अडचण दूर करण्याची मागणी करत डॉक्टर ऑफ फार्मसी असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले. स्वयंअर्थसाहाय्य शाळा स्थापना व विनिमय अधिनियम २०१२ मध्ये आणखी सुधारणा करण्याच्या मागणीला घेऊन शिक्षण संघर्ष संघटनेच्या वतीने पंचवटी चौकात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.
...Read More

V. S. News
लातुरमध्ये वसंतराव नाईक महामंडळात साडेतीन कोटींचा गैरव्यवहार

व्हिएस न्युज - साडेतीन कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गैरव्यवहार करणाऱ्या वसंतराव नाईक महामंडळाच्या लातूर शाखेचा व्यवस्थापक प्रेमसिंग गोबरा राठोड याला पोलिसांनी नांदेड येथून अटक केली. याप्रकरणी नोव्हेंबर महिन्यात गुन्हा दाखल झाला होता.नाईक महामंडळाच्या लातूर शाखेत २०१४ ते २०१७ या काळात प्रेमसिंग राठोड जिल्हा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. त्याची बदली झाल्यानंतर शैलजा काळे या पदावर रुजू झाल्या. पदभार घेतल्यानंतर त्यांनी कागदपत्रांची पाहणी केली तेव्हा काळे यांना लातूर शाखेत कोट्यवधीचा गैरव्यवहार झाल्याचे लक्षात आले. त्यांनी कागदपत्रांची तपासणी केली. यात ३ कोटी ६८ लाख ७७११९ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. काळे यांनी या प्रकरणाची ५ नोव्हेंबर २०१७ रोजी लातूरच्या गांधी चौक ठाण्यात फिर्याद दिली. मात्र मुख्य आरोपी प्रेमसिंग राठोड याच्यासह इतर तीन आरोपी फरार होते.

प्रेमसिंग राठोड याची सध्या हिंगोली आणि परभणी येथे नियुक्त करण्यात आली होती, असे नाईक महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून सातत्याने सांगण्यात येत होते.

या मोठ्या गैरव्यवहाराच्या प्रकरणात गुन्हा दाखल होऊनही महामंडळाकडून राठोड याच्यावर मात्र कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती. यामुळे आश्चर्य व्यक्त होत असताना सहायक पोलिस निरीक्षक सत्यवान हाके याच्या पथकाने मंगळवारी रात्री राठोड याला अटक केली. या प्रकरणात अटकसत्र सुरू झाल्यामुळे या कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांत आता धास्ती पसरली असून तपासात या सर्व गैरव्यवहाराच्या सुरस कथा बाहेर येण्याची शक्यता आहे.
...Read More

V. S. News
नाशिक व नंदुरबारमधील भीषण अपघातात 11 जणांचा मृत्‍यू

व्हीएस न्यूज - नाशिक व नंदुरबारमध्‍ये आज पहाटेच्‍या सुमारास भीषण अपघात झाले असून या दोन्‍ही अपघातात 11 जणांना जीव गमवावा लागला आहे.नाशकात अॅपे रिक्षाला ट्रकने धडक दिल्‍याने रिक्षातील सातही प्रवासी जागीच ठार झाले तर नंदुरबारमध्‍येदेखील मालवाहतुक करणारी गाडी व रिक्षाची समोरासमोर धडक झाल्‍याने 4 जण मृत्‍युमूखी पडले आहेत.
नाशकात 7 ठार
आज पहाटेच्‍या सुमारास सटाणा-मालेगावर रोडवर शेमळी शिवारात अज्ञात ट्रकने रिक्षाल जोरदार धडक दिली.यामध्‍ये रिक्षातील सातही प्रवाशांचा जागीच मृत्‍यू झाला.ट्रक मालेगावहून सटाण्‍याच्‍या दिशेने जात असताना हा अपघात झाला.मृत्‍यूमुखी पडलेल्‍या प्रवाशांचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.मात्र अपघात स्थळी सापडलेल्‍या खेळणी व इतर साहित्‍यावरुन ते व्‍यवसायिक असावेत असा अंदाज बांधला जात आहे.सध्‍या सटाण्‍यात यशवंत महाराजांची यात्रा सुरु असून या यात्रेत खेळणी विक्रीचा व्‍यवसाय करण्‍यासाठी ते येत असावेत असा अंदाज आहे.

नंदुरबारमध्‍ये 4 मृत्‍युमूखी-
शहादा तालुक्‍यातील म्‍हसावद-आमोदा रस्‍त्‍यावर अॅपेरिक्षा आणि मालवाहतूक करणा-या गाडीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला.यामध्‍ये 4 जण जागीच ठार झाले आहेत.तर 11 जणांची स्थिती गंभीर आहे.यांपैकी तिघांची प्र‍कृती अतिशय चिंताजनक असून मृतांची संख्‍या आणखी वाढण्‍याची भिती वर्तवण्‍यात येत आहे.जखमीमध्‍ये आदिवासी कला पथकातील कलाकारांचाही समावेश आहे.जखमींवर शहादा आणि म्‍हसावद येथील शासकीय रुग्‍णालयात उपचार सुरु आहेत.
...Read More

V. S. News
मालेगाव बॉम्बस्फोटातील तिघांची मुक्तता

व्हिएस न्युज - मालेगाव बॉम्बस्फोटाच्या आरोपातून तीन जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. तर कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह सहा जणांवरील मोक्काचा आरोप हटविण्यात आला आहे. आता त्यांच्या विरोधात केवळ बेकायदा शस्त्र बाळगल्याचा खटला चालणार आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील श्याम शाहू, प्रवीण टक्कलकी आणि शिवनारायण कालसंग्रा या तिघांची सर्व आरोपांतून मुक्तता करण्यात आली आहे. मुंबईतील एनआयए न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. राकेश धावडे आणि जगदीश म्हात्रे यांच्यावरील अनेक कलमेही हटवण्यात आली आहेत. दोघांवर केवळ शस्त्रास्त्र अधिनियमाअंतर्गत खटला चालणार आहे. मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात सात जणांचा मृत्यू झाला होता, तर जवळपास १०० जण जखमी झाले होते. मालेगावात एका बाईकमध्ये बॉम्ब लावून हा स्फोट घडवण्यात आला होता. यानंतर स्फोटासाठी आरडीएक्स पुरवणे आणि कट रचल्याच्या आरोपाखाली साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना अटक करण्यात आली होती.

एनआयएने साध्वी प्रज्ञासिंहसोबत सहा जणांना क्लीनचिट दिली होती. त्यानंतर लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहितलाही जामीन मंजूर झाला होता. सर्वोच्च न्यायालयाने ९ वर्षापासून तुरुंगात असलेल्या कर्नल पुरोहितला जामीन मंजूर केला. एनआयएने नव्याने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये प्रज्ञा ठाकूर, कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय रहिरकर, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी या सर्वच आरोपींवरचा मोक्का काढला होता. त्यामुळे कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंह यांना जामिन मिळाला आहे. त्यांच्यावर आता फक्त बेकायदा शस्त्र बाळगल्याचा खटला चालणार आहे.
...Read More

V. S. News
मुंबईत मांजरांची संख्या वाढली

व्हिएस न्यूज – पाच वर्षांपूर्वी मुंबईमध्ये पाळीव तसेच भटक्या प्राण्यांमध्ये कुत्र्यांची संख्या सर्वाधिक होती. आता मात्र त्यांची जागा मांजरींनी गेतल्याचे समोर येत आहे. पाळीव मांजरांपेक्षा तिप्पट संख्येने रस्त्यावर भटकणा-या मांजरींच्या संख्ये वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दूध पिऊन, मासे खाऊन गपगुमान पडून राहणा-या या मांजरांमुळे डोक्याला काही ताप नाही, असा अनेकांचा समज असतो. मात्र मांजरांची ही वाढती संख्या अशीच वाढत राहिली तर त्यामुळे श्वसनाचे विकार वाढण्याची शक्यता आहे. मांजरीचे केस मोठय़ा प्रमाणात गळतात. ते लहान मुलांच्या तोंडात गेले वा त्यावरील धूलिकण नाकात गेले तर त्वचा आणि श्वसनाचे आजार होऊ शकतात, याकडे प्राण्यांच्या डॉक्टरांनी लक्ष वेधले आहे. याच कारणांसाठी अनेकांनी घरात पाळलेल्या मांजरींनाही रस्त्यावर सोडून देण्यास सुरुवात केली आहे.

प्राण्यांच्या रुग्णालयांमध्ये विविध प्रकारचे पाळीव, भटके तसेच सोडून दिलेले, जखमी प्राणी उपचारांसाठी आणले जातात. पूर्वी दिवसाला दोन ते तीन मांजर उपचारांसाठी रुग्णालयात आणल्या जात होत्या, आता हेच प्रमाण वाढून दहा ते बारावर गेले आहे. मांजरींची वाढती संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी कोणतेही कार्यक्रम हाती घेतले जात नाहीत. कुत्र्यांप्रमाणे मांजरींचीही गणना व्हावी, त्यांच्या प्रजातींची नोंद राहावी यासाठी बाई साखराबाई दिनशॉ पेटीट रुग्णालयाचे सचिव डॉ. खन्ना यांनी पालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

आता मांजरींसाठी तीन वॉर्ड
मांजरी अधिक पिलांना जन्म देत असल्याने त्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. वैद्यकीय कारणांसाठी रुग्णालयात येणा-या मांजरांची संख्या कुत्र्यांपेक्षा अधिक आहे. पूर्वी रुग्णालयामध्ये मांजरांसाठी एक वॉर्ड राखीव ठेवण्यात आला होता. आता मांजरांचे प्रमाण वाढल्यामुळे रुग्णालयात तीन वॉर्ड सुरू करण्यात आले आहेत. रात्री-अपरात्री मांजरी सोडण्यासाठी येणा-या प्राणीमित्र मुंबईकरांची संख्याही मोठी आहे. अशा मांजरांना सांभाळण्यासाठी एक विशेष कक्षही बनवण्यात आला आहे.
...Read More

V. S. News
मनमोहन सिंग यांच्या देशभक्तीवर शंका नाही!

अरुण जेटलींचा राज्यसभेत खुलासा

व्हिएस न्यूज – माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या देशभक्तीबद्दल कोणतीही शंका नाही. मनमोहन सिंह आणि माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या देशाशी असलेल्या बांधिलकीबाबत कोणतेही प्रश्न चिन्ह उपस्थित केलेले नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत केल्यानंतर विरोधकांच्या विरोधाची धार कमी झाली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर बेफाम आरोप करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत माफी मागावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली होती.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंह, हमीद अन्सारी आणि मणिशंकर अय्यर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. ‘‘मला पदावरून हटवण्यासाठी मणिशंकर अय्यर यांनी पाकमधून सुपारी घेतली होती, असा आरोप मोदींनी प्रचारसभेत केला होता. अय्यर यांच्या घरी पाक अधिका-यांसोबत बैठक झाली आणि दुस-या दिवशी मला हिणवले. गुजरातमध्ये निवडणूक सुरू असताना ही बैठक का घेतली, या बैठकीत मनमोहन सिंग, हमीद अन्सारी आदी मंडळी का उपस्थित होती.’’ असे मोदी म्हणाले होते.

त्यावरून राज्यसभेत गेले अनेक दिवस गोंधळ सुरू होता. काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. नरेंद्र मोदी यांनी संसदेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस खासदारांनी लावून धरली होती. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच काँग्रेस खासदारांनी या मागणीवरुन सभागृहात गदारोळ घातला.

शेवटी बुधवारी राज्यसभेत अरुण जेटली यांनी स्पष्टीकरण दिले. नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणातून मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांची देशाशी असलेल्या बांधीलकीवर प्रश्न उपस्थित केलेले नाही किंवा त्यावर प्रश्न उपस्थित करण्याचा त्यांचा हेतूदेखील नव्हता. ते दोघेही ज्येष्ठ नेते असून त्यांची देशाशी असलेल्या बांधीलकी सर्वश्रृत आहे, असे त्यांनी सांगितले.
...Read More

V. S. News
कुलभूषण यांच्या पत्नीच्या बुटात हेरगिरीची उपकरणे

व्हिएस न्यूज – कुलभूषण जाधव यांच्या पत्नीने भेटायला येताना आपल्या बुटांमध्ये हेरगिरी करण्यासाठीची उपकरणे लपविली होती. त्यामुळे त्यांचा बूट जप्त करण्यात आला आणि त्यांना भेटीपूर्वी दुसरे कपडे घालण्यासाठी देण्यात आले, असा कांगावा आता पाकिस्तानने सुरू केला आहे. कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानने दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर पाकने सारवासारव करण्यास सुरुवात केली आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मुहम्मद फैसल यांनी हा कांगावा केला आहे. ‘जाधव यांच्या पत्नीचा बुट सुरक्षेच्या कारणास्तव ताब्यात घेतला होता. त्यांच्या बुटात हेरगिरीसाठीची उपकरणे ठेवली असण्याचा आम्हाला संशय होता. त्यामुळे हे बुट ताब्यात घेतले असून त्याचा तपास सुरू आहे’, असे सांगतानाच ‘जाधव यांच्या पत्नीला दुसरे बुट देण्यात आले होते आणि त्यांना त्यांचे सर्व दागिनेही परत करण्यात आले होते’, असेही त्यांनी सांगितले.

इस्लामाबाद येथे जाधव यांना भेटण्यासाठी त्यांची आई आणि पत्नी सोमवारी आल्या होत्या. ही भेट होण्यापूर्वी पाकिस्तानने त्यांना दुसरे कपडे परिधान करण्यासाठी दिले होते. तसेच त्यांच्या बांगडय़ा, टिकली, मंगळसूत्र, कर्णफुले आणि इतर दागिनेही काढून घेतले होते. ही माहिती बाहेर आल्यानंतर पाकिस्तानविरोधात प्रचंड संतापाच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानने त्यावर पडदा टाकण्यासाठी आता नवा कांगावा केला आहे. दरम्यान, जाधव प्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज गुरुवारी संसदेत निवेदन देणार आहेत.
...Read More

V. S. News
विधान भवनाला घेरावाचा मराठा समाजाचा इशारा

व्हिएस न्यूज - आझाद मैदानावर आलेल्या सकल मराठा समाजाच्या मोर्चाला सरकारकडून दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्यामुळे पुन्हा विधान भवनाला घेराव घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २६ फेब्रुवारी रोजी मराठा समाज अधिवेशन काळात विधानभवनाला घेराव घालणार आहे. या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला १० फेब्रुवारीपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. पनवेल येथे झालेल्या मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पनवेलमध्ये झालेल्या या बैठकीस राज्यभरातून २९ जिल्ह्यातील मराठा समाजाचे प्रतिनिधी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सकल मराठा समाज नवी मुंबई व रायगड यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. मराठा समाजाने आरक्षण आणि इतर विविध मागण्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात, विभागनिहाय मूक मोर्चे काढले. त्यानंतर मुंबईतही सर्वात मोठा मूकमोर्चा काढण्यात आला.

त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर मागण्या मान्य होतील, असे आश्वासन दिले होते. मात्र अजूनही समाजाच्या मागण्या मान्य करून त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत कोपर्डीप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. मात्र अट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल होत असल्याने त्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून मराठा युवकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सरकारने काहीच पावले न उचलल्याने त्यावरही चर्चा झाली. शेतीला हमीभाव, स्वामिनाथन आयोग, सारथी संस्था, प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह अशा मुद्यांवरही चर्चा झाली. दरवर्षी १९ फेब्रुवारीला तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यावर या बैठकीत एकमत झाले.

जळगाव येथे ११ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी राज्यस्तरीय बैठक घेण्याचे यावेळी ठरले. प्रत्येक गावात शाखा स्थापन करून जिल्हा आणि विभागवार बैठका घेऊन समाजाला आंदोलनाची माहिती देण्यात यावी, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
...Read More

V. S. News
‘पद्मावती’चे भवितव्य आता इतिहास तज्ञांच्या हाती!

व्हिएस न्यूज- इतिहासाची मोडतोड केल्याच्या आरोपावरून वादात सापडलेल्या ‘पद्मावती’ चित्रपटाचे भवितव्य आता इतिहास तज्ञांच्या हाती सोपविण्यात आले. त्यासाठी इतिहासतज्ञांच्या सहा सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली आहे. नववर्षाच्या सुरुवातीला ‘पद्मावती’चे नेमके काय होणार हे समजणार आहे.

‘पद्मावती’ हा सिनेमा अंशत: ऐतिहासिक घटनांवर आधारित असल्याचे सिनेनिर्मात्यांनी सांगितल्यामुळे केंद्रीय चित्रपट निरीक्षक मंडळाने इतिहासतज्ञ आणि राजघराण्यातील काही व्यक्तींना ‘पद्मावती’ पाहण्यासाठी निमंत्रित केले आहे. निर्मात्यांनी ‘पद्मावती’ अंशत: ऐतिहासिक घटनांवर आधारित असल्याचे सांगून संकट ओढावून घेतल्याचे सेन्सॉर बोर्डाने म्हटले आहे.

‘पद्मावती’ चित्रपटातील आशयाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी ही छाननी करावी लागणार असल्याचे बोर्डाने सांगितले. ‘पद्मावती’ काल्पनिक आहे की ऐतिहासिक घटनांवर आधारित यासंबंधी विचारणा करणारा फॉर्ममधील भाग रिकामा ठेवल्यामुळे सेन्सॉर बोर्डाने सिनेमाची कॉपी निर्मात्यांना परत पाठवली होती.

‘पद्मावती’ १ डिसेंबर २०१७ रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी महिनाभर आधी हे रीलिज अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले. राणी पद्मिनी अर्थात पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पदुकोन असून शाहिद कपूरने राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीची व्यक्तिरेखा साकारली आहे. ‘पद्मावती’ चित्रपटात रणवीर सिंग अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत आहे. अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे. ‘पद्मावती’ सिनेमाचे रीलिज मार्च महिन्यापर्यंत लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्टिफिकेट मिळवण्यासाठी ‘पद्मावती’ पूर्वी विविध भाषांतील जवळपास ४० चित्रपट रांगेत आहेत. इतिहास तज्ञांच्या सहा सदस्यीय समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ‘पद्मावती’चे भवितव्य ठरणार आहे.
...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!