व्हिएस न्यूज - सर्वोच्च न्यायालयाने महिलांच्या दृष्टीने अन्यायकारक अशी मुस्लीम समाजातील ‘ट्रिपल तलाक’ची प्रथा अवैध ठरविल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने गुरुवारी असा तलाक देणे हा फौजदारी गुन्हा ठरवून त्यासाठी पतीला तुरुंगात पाठविण्याची तरतूद असलेले विधेयक बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतले.
या विधेयकाला काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांचा विरोध व दुरुस्त्या नाकारून मंजुरी मिळाली असली तरी सत्ताधा-यांचे बहुमत नसलेल्या राज्यसभेत ते मंजूर करून घेण्यात सरकारचा कस लागेल. काँग्रेससह संपूर्ण विरोधी पक्षाने विधेयकावरील चर्चेच्या वेळी या विधेयकाच्या स्वरूपावर आक्षेप घेतला. ‘ट्रिपल तलाक’ची प्रथा बंद व्हायला हवी, या बाजूचे काँग्रेस,अण्णाद्रमुक, डावे पक्ष, सपा, आरएसपी, राजद, बीजेडी यांच्यासह अन्य पक्ष दिसले. पण त्यांचा हा फौजदारी गुन्हा ठरवून त्यासाठी शिक्षेची तरतूद करण्यावर आक्षेप होता. विधेयक सविस्तर विचार विनिमयासाठी संसदीय समितीकडे पाठविले जावे व नंतर ते एकमताने मंजूर करता येईल, असे त्यांचे म्हणणे होते.
रविशंकर प्रसाद म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही जर असे तलाक दिले जात असतील तर त्यावर काय कारवाई करावी यासाठी प्रचलित कायद्यात कोणतीही तरतूद नसल्यामुळे हे विधेयक संसदेने मंजूर करुन त्याला कायदेशीर स्वरुप द्यावे. त्यामुळे महिलांची मुस्लिम पुरुषांच्या अत्याचारापासून सुटका होऊ शकेल.
सरकार घाईघाईने हा निर्णय घेत आहे. त्याऐवजी सरकारने सर्व पक्षांशी चर्चा करुन एक परिपूर्ण विधेयक सभागृहात मांडायला हवे असे काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे, सुष्मिता देव, आरएसपीचे एन. के. प्रेमचंद्रन,एमआयएमचे सदस्य असद्दुद्दीन ओवैसी, सपाचे धर्मेंद्र यादव, आरजेडीचे जयप्रकाश यादव या सदस्यांनी पुन्हा पुन्हा सांगितले. या सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला की,ऐवढी काय घाई आहे की, हे विधेयक सरकार आजच मंजूर करु इच्छिते.
व्हिएस न्यूज - समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार नरेश अग्रवाल यांनी पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर सध्या बरेच अडचणीत आले आहेत. अलाहाबादमध्ये त्यांच्याविरोधात राष्ट्रीय हिंदू संघटनने जोरदार आंदोलन केले. त्यांच्या पुतळ्याचे दहनही यावेळी करण्यात आले. त्याचबरोबर त्यांची जीभ कापून जो कोणी आणेल त्याला १० लाखांचा पुरस्कार देण्यात येईल अशीही घोषणा या संघटनेने केली आहे.
दहशतवादी म्हणून कुलभूषण जाधव यांचा उल्लेख करणे ही अतिशय शरमेची बाब असून त्यांनी यापुढे अशाप्रकारची वादग्रस्त विधाने करु नयेत यासाठी त्यांची जीभ कापली गेली पाहिजे. असे वक्तव्य या संघटनेचे संयोजक सत्येंद्र सिंह यांनी केले आहे. त्यांनी याचवेळी नरेश अग्रवाल यांची जीभ कापून आणणाऱ्याला १० लाखांचे बक्षीसही जाहीर केले आहे. तसेच या आंदोलनावेळी नरेश अग्रवाल यांचे राज्यसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आरोप
व्हिएस न्यूज – राजकीय फायद्यासाठी भाजप खोटे बोलत असून त्यांच्यामुळे आज देशाला धोका निर्माण झाला आहे, शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेला भाजपपासून धोका आहे. घटना बदलण्यासाठी भाजप गुपचूप कारस्थान करत असल्याचा आरोप कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.
काँग्रेस पक्षाला १३३ र्वष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते. अध्यक्ष म्हणून पक्षाच्या स्थापना सोहळ्याला राहुल यांनी पहिल्यांदाच संबोधित केलं. आपल्या देशाची पायाभरणी करणा-या घटनेलाच आज भाजपपासून धोका निर्माण झाला आहे. भाजपचे नेतेही त्यावर उघडपणे प्रतिक्रिया देत आहेत. घटना बदलण्यासाठी गुपचूप कारस्थानं सुरू असून घटनेला वाचविण्याची आपल्यावरच जबाबदारी असल्याचंही राहुल यांनी सांगितलं. ह्यआज देशाशी धोकेबाजी केली जात आहे.
भाजप राजकीय फायद्यासाठी खोटं बोलत असून त्यांच्यात आणि आपल्यात हाच फरक आहे. आपण भलेही काही चांगलं केलं नसेल, भलेही आपण निवडणुकांमध्ये पराभूत झालो असू. पण आपण सत्याची कास सोडता कामा नये, असं आवाहनही त्यांनी केलं. दरम्यान, राहुल यांनी बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना ह्यजेटलाइ ( जेट असत्य) असं संबोधून त्यांची संभावना केली होती.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002