Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
स्वत:च्या फायद्यासाठी मोदी सरकारकडून ट्रीपल तलाकचा वापर

व्हीएस न्यूज केंद्रातील मोदी स्वत:च्या फायद्यासाठी मुस्लिम महिला (विवाह संरक्षण हक्क) विधेयकाचा वापर करत असल्याचा आरोप जमियत उलेमा-ए-हिंदचे सरचिटणीस मौलाना मेहमूद मदनी यांनी केला आहे. तसेच मुख्य विषयापासून देशातील नागरिकांचे लक्ष्य वळविण्यासाठी सरकारने विधेयकाचा घाट घातल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज्यसभेत मुस्लिम महिला (विवाह संरक्षण हक्क) विधेयक मांडल्यानंतर प्रचंड गदारोळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मदनी यांनी त्या पार्श्वभूमीवर माध्यमांसमोर हा आरोप केला आहे. ट्रीपल तलाकच्या घटनांचे प्रमाण अत्यल्प आहे. केवळ स्वत:चे हित साधण्याकरता सरकार विधेयकाचा वापर करत असल्यामुळे त्याचा मुस्लिम महिलांना विशेष फायदा होणार नाही. तसेच याकरिता केवळ कायदेशीर पातळीवर केलेल्या बदलाने प्रश्न सुटणार नाहीत. तर त्यासाठी सामाजिक परिवर्तनाची गरज असल्याचे मौलाना मेहमूद मदनी यांनी म्हटले आहे. ट्रीपल तलाक कायदा संमत करणे योग्य निर्णय आहे. पण, संमत करण्यामागचा सरकारचा उद्देश योग्य नसल्याचा आरोप मदनी यांनी यावेळी बोलताना केला.

...Read More

V. S. News
भारतातील लोकांना संघानेच सुरक्षित ठेवले – निवृत्त न्यायमूर्ती

व्हीएस न्यूज - राष्ट्रीय स्वंयसेवक संघानेच (आरएसएस) भारतातील लोकांना संविधान, लोकशाही आणि सैन्यदलानंतर सुरक्षित ठेवल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती के.टी.थॉमस यांनी व्यक्त केले आहे. धर्मनिरपेक्षतेचा विचार धर्मापासून दूर ठेवला जाऊ नये, असेही ते म्हणाले. केरळमधील कोट्टयम येथे आरएसएसच्या प्रशिक्षण शिबिरात ३१ डिसेंबर रोजी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. मला जर आणीबाणीपासून सुटका करण्याचे श्रेय कोणा एका संस्थेला द्यावयाचे म्हटले तर मी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देईन, असे सांगत आपल्या स्वंयसेवकांमध्ये राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी संघ शिस्तबद्धता शिकवते.

पुढे ते म्हणाले, आपल्यावर साप विषाचा उपयोग होणाऱ्या हल्ल्याविरोधात हत्यार म्हणून करतात. पण एखाद्यावर हल्ला करण्यासाठी मानवाची शक्ती तयार केलेली नाही. मी आरएसएसचे कौतुक शारीरिक शक्तिचा अर्थ हल्ल्यांपासून स्वत:ला वाचवणे असा आहे. असे सांगण्यासाठी आणि विश्वास निर्माण करण्यासाठी करतो. एखाद्या हल्ल्यावेळी देश आणि समाजाचे रक्षण करण्यासाठी आरएसएसचे शारीरिक प्रशिक्षण असते, असे मला वाटते.

मला कोणी जर विचारले की, भारतात लोक सुरक्षित आहेत का?, तर मी सांगेन की, देशात एक संविधान आहे, लोकशाही आहे, सैन्यदल आहे आणि चौथा संघ आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही आणीबाणीविरोधात आरएसएसच्या मजबूत आणि संघटीत कार्याची चाहूल लागली होती. तेव्हाच त्यांना समजले होते की, आणीबाणीचे प्रकरण जास्त दिवस चालू शकणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.

...Read More

V. S. News
कमला मिलमधील 'वन अबव्ह'ला बारची परवानगी नव्हती!

व्हिएस न्यूज- कमला मिल कम्पाउंडमध्ये वनअबव्ह रेस्ट्रोपबला लागलेल्या आगीनंतर महापालिकेतील गैरप्रकार उघड होत आहेत. पालिकेच्या बांधकाम विभागाने वनअबव्हला ऑफिस बांधण्यासाठी परवानगी दिली होती, रेस्टॉरंटसाठी नाही. पण आरोग्य विभागाने याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत 'खानपाना'ची परवानगी दिल्याने पालिकेचा काळा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
कमला मिल कम्पाउंडमध्ये २९ डिसेंबरला वनअबव्ह आणि मोजोस बारला लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे पितळ उघडे पडले आहे. बांधकाम विभागाने रेस्टॉरंटला परवानगी नाकारली असतानाही आरोग्य विभागाने त्याला परवानगी दिली. 'बांधकाम विभागाने २०१२ मध्ये वनअबव्हला ऑफिस बांधण्याची परवानगी दिली होती. यानंतर २०१७ मध्ये त्यांनी रेस्टॉरंटसाठी आमच्याकडे परवानगी मागितली होती. पण अग्निशमन विभागाच्या नियमांची पूर्तता केली नसल्याने आम्ही त्यांना परवानगी नाकारली होती', अशी माहिती कार्यकारी अभियंता सतीश गिते यांनी दिली. मात्र महापालिकेच्या जी दक्षिण वॉर्डच्या आरोग्य विभागाने याकडे दुर्लक्ष केलं आणि रेस्टॉरंटला परवानगी दिली.

वैद्यकीय अधिकारी सतीश बडगिरे आणि जी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी गैरप्रकारांना मदत केल्याचे समोर येत आहे. बांधकाम विभागाची परवानगी नसतानाही बडगिरे यांनी कशी काय परवानगी दिली? असा प्रश्न गिते यांना विचारण्यात आला. पण याचं उत्तर बडगिरेच देऊ शकतील, असं गिते म्हणाले. गैरप्रकारात सहभागी असल्याचा ठपका ठेवत बडगिरे यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर रेस्टॉरंटला परवानगी देणारे जी दक्षिण वॉर्डचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्याकडेही या प्रकरणी विचारणा करण्यात आली. 'वनअबव्हने रेस्टॉरंटसाठी कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. याची कुठलीही माहिती बांधकाम विभागाने वॉर्ड कार्यालयाला दिली नाही', असं स्पष्टीकरण देत सपकाळे यांनी हात झटकलेत. पण समाजिक कार्यकर्त्यांनी सपकाळे यांचा दावा फेटाळून लावला आहे. एमआरटीपीच्या नियमांचे भंग होत असल्यास सर्व विभागांना आणि अधिकाऱ्यांना नोटीस दिली जाते. यामुळे सपकाळे साफ खोटं बोलत आहेत', असं सामाजिक कार्यकर्ते अनिल जोसेफ यांनी सांगितलं
...Read More

V. S. News
राष्ट्रीय कबड्डीत महाराष्ट्राची विजयी घोडदौड

व्हिएस न्यूज - भारतीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेने हैदराबादमध्ये सुरु असलेल्या ६५ व्या पुरुष व महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांनी बाद उपांत्य पूर्व फेरीत धडक मारली आहे. दुसरीकडे पुरुष संघाने दुसरा सामना जिंकत स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. हैदराबाद येथील गचिबोवली जी.एम.सी. इनडोअर क्रीडा संकुलातील मॅटवर झालेल्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात महाराष्ट्राच्या महिलांनी उत्तरांचल संघाचा ५२-१६ अशा फरकाने सहज पराभूत केले. यापूर्वी महिला संघाने ओडीसाला ६५-१५ असे पराभूत केले होते.

या दोन्ही सामन्यात सायली जाधव, कोमल देवकर, अभिलाषा म्हात्रे, ललिता घरट, सुवर्णा बारटक्के यांनी चांगली कामगिरी केली. पुरुषांच्या दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राने गुजरातचा ५०-१९ धुव्वा उडवला. रिशांक देवाडीगा, नितीन मदने, विकास काळे, विराज लांडगे यांनी या सामन्यात चमकदार खेळी दाखवली. महाराष्ट्राच्या पुरुष संघाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना पौंडेचरी संघाविरुद्ध होणार आहे. या गटातून महाराष्ट्र गटविजेता म्हणून बाद फेरीत सहज प्रवेश करेल, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे.
...Read More

V. S. News
विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी १ तास उशीरा येण्याची मुभा

व्हीएस न्यूज - भीमा-कोरेगाव हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदचा परिणाम सामान्य जनजीवनावर झाला आहे. अनेक शाळा आणि कार्यालयांनीही बंदचा त्रास होऊ नये म्हणून सुट्ट्या दिल्या आहेत. आज विधी आणि इंजिनियरींगबरोबरच एकूण १३ अभ्यासक्रमांच्या परीक्षा आहेत. परंतु बंदमुळे त्या रद्द केल्या जाणार नाहीत असे विद्यापीठाकडून कळवण्यात आले आहे. मुंबईमध्ये बंदमुळे वाहतूक संथ गतीने सुरु आहे. काही मार्गांवर रेल्वे अडवल्याने रेल्वेच्या नियमित वेळापत्रकापेक्षा रेल्वे उशीराने धावत आहेत. तर दुसरीकडे आंदोलक रस्त्यांवर उतरल्याने तेथील वाहतूकही थंडावली असल्याचे चित्र आहे.

शहरात अशाप्रकारचे वातावरण असताना परीक्षा होणार की नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. मात्र परीक्षा नियोजित वेळेतच होईल असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. मात्र यामध्ये विद्यार्थ्यांना थोडी सूट दिली जाणार असल्याचेही विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे. परीक्षेच्या वेळेपेक्षा एक तास उशीरा आले तरीही विद्यार्थ्यांना पेपर देता येईल. त्यामुळे ज्यांचे पेपर सकाळी ११ ला आहेत त्यांनी १२ पर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचले तरी चालेल, तर ज्या विद्यार्थ्यांचा पेपर दुपारी ३ वाजता आहे ते विद्यार्थी ४ वाजेपर्यंत पोहोचले तरी चालणार आहे. त्यामुळे काहीसा उशीर झाला तरीही वेळेची मुभा देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

...Read More

V. S. News
सर्वोत्तम एकदिवसीय संघाचा विराट कोहली कर्णधार

व्हीएस न्यूज - २०१७सालातील सर्वोत्तम एकदिवसीय संघाची घोषणा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली असून विशेष म्हणजे या संघामध्ये ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही खेळाडुला स्थान मिळालेले नाही.

या एकदिवसीय संघामध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेच्या २ आणि इंग्लंडच्या ३ खेळाडूंना स्थान दिले आहे. या संघात पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानमधील १-१ खेळाडूला स्थान मिळाले असून भारतीय क्रिकेट संघातील रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पंड्याचा या संघात समावेश करण्यात आला आहे.

संघाचा कर्णधार विराट कोहलीला बनवण्यात आला आहे. २०१७ मध्ये २६ पैकी १९ सामन्यांमध्ये कोहलीने विजय मिळवला आहे. सलामीवीर म्हणून रोहित शर्मा आणि क्विंटन डी. कॉकला निवडण्यात आले आहे. २०१७ मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा रोहित शर्मा दुसरा खेळाडू आहे. त्याने ६ शतक आणि पाच अर्धशतकांसह १२९३ धावा केल्या.

असा आहे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम एकदिवसीय संघ – रोहित शर्मा (भारत), क्विंटन डी कॉक (द अफ्रिका), विराट कोहली (कर्णधार, भारत), जो रूट (इंग्लंड), एबी डिव्हिलियर्स (द आफ्रिका), बेन स्टोक्स (इंग्लंड), हार्दिक पंड्या (भारत), लियाम प्लंकेट (इंग्लंड), ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड), हसन अली (पाकिस्तान), रशीद खान (अफगाणिस्तान).

...Read More

V. S. News
भीमा कोरेगावमध्ये घडलेला प्रकार निंदाजनक – संघ

व्हीएस न्यूज - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांकडून लक्ष्य करण्यात येत आहे. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी या पार्श्वभूमीवर एका निवेदनाद्वारे संघटनेची भूमिका मांडली. काही घटक समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा शक्तींना बळी पडू नका, शांतता राखा, असे आवाहन त्यांनी केले.

भीमा कोरेगावाचा हिंसाचार आणि त्यानंतर मुंबई, पुण्यासह त्याचे राज्यभरात उमटलेले पडसाद ही खूप दु:खद बाब आहे. जो काही प्रकार भीमा कोरेगावमध्ये घडला तो निंदाजनक असून याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तीव्र निषेध करत असल्याचे वैद्य यांनी सांगितले. यात जे दोषी आढळतील त्यांना कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे. समाजात काही घटक जाणीवपूर्वक द्वेष आणि वैरभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा शक्तींच्या सुप्त हेतूंना लोकांनी बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले. विरोधी पक्षांकडून संघ आणि भाजपला भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून लक्ष्य केले जात आहे. कोरेगाव येथील ‘विजय दिवस’ देशविरोधी ठरवत त्याबद्दल उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी आक्षेप घेतला होता. संघ आणि भाजपनेच या हिंसाचाराला खतपाणी घातल्याचा आरोप काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांकडून या पार्श्वभूमीवर केला जात आहे.

...Read More

V. S. News
राज्यातील काही भागांत इंटरनेट सेवा बंद

व्हीएस न्यूज भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव परिसरात झालेल्या दगडफेकीच्या प्रकरणानंतर आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बंदला राजधानी मुंबईसह राज्यभरातील प्रमुख शहरात सुरुवात झाली असून आंदोलकांनी ठाण्यात रेल्वे स्थानकामध्ये ट्रॅकवर उतरून सुमारे १० मिनिटे लोकल रोखून धरली. तसेच मुंबईच्या चेंबुर नाका परिसरात स्कूल बसची तोडफोड करण्यात आल्याने तणावपूर्ण शांतता आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले आहे. या बंदला महाराष्ट्र लोकशाही आघाडी, डावी लोकशाही आघाडी, संभाजी ब्रिगेड यांसह अडीचशेहून आधिक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान वाहतुकीचा खोळंबा होणार असल्याने डबेवाल्यांनी आज सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतही भिमा-कोरेगाव घटनेच्या पडसादानंतर बंद पुकारण्यात आला आहे. वाहतुकीचा खोळंबा होणार झाल्याने जेवणाचे डबे चाकरमान्यांना वेळेवर कार्यालयात पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे डब्यांचा काही उपयोग होत नाही, त्यामुळे आज मुंबईत जेवणाचे डबे पोहोचविण्याची सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

...Read More

V. S. News
भीमा-कोरेगाव हिसांचारामागे राजकीय षड्यंत्र – संजय राऊत

व्हीएस न्यूज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भीमा-कोरेगाव हिसांचाराच्या घटनेमागे राजकीय षड्यंत्र असून त्यामुळेच उर्वरित महाराष्ट्रात याचे पडसाद उमटले असल्याचा आरोप केला आहे. आज महाराष्ट्र जातीय रेषेमध्ये विभागला जात असून या सर्वामागे एक राजकीय षड्यंत्र असून असे जातीवरून राजकारण यापूर्वीच्या नेत्यांनी केले नसल्याचेही राऊत म्हणाले.

राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील हा हिंसाचार धक्कादायक आणि सर्वासाठीच ही चिंतेचे बाब असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी अपराध्यांचा शोध घेण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. तसेच काही अदृश्य हात या घटनांमागे आहेत जे याचा राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्राला उद्ध्वस्त करू इच्छितात आणि हे कोण आहेत, यांचा शोध घेणे पंतप्रधानांचे कर्तव्य असल्याचे ही ते म्हणाले. कोरेगाव भीमा येथील विजय दिनाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणी राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहे.

...Read More

V. S. News
राहुल गांधीनी कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्यावी

व्हीएस न्यूज संघ आणि भाजप दलितविरोधी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केले होते. गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी त्यावर प्रत्युत्तर देत कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी परिस्थितीची पूर्ण माहिती घ्यावी, असे म्हटले आहे.

कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी लोकांना घटनास्थळाची संपूर्ण परिस्थिती माहीत असावी. लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिलेले आहेत, असे गृहराज्य मंत्री हंसराज अहिर म्हणाले.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी राहुल गांधी यांनी भाजप आणि संघाला जबाबदार ठरवले. तसेच दलितविरोधी संघ आणि भाजप असल्याचे गांधी यांनी मंगळवारी म्हटले. संघ आणि भाजपची दलित हे सगळ्यात खालच्या स्तरावर समाजात राहिले पाहिजेत, ही विचारसरणी आहे. उना येथे दलितांना झालेली मारहाण, रोहित वेमुलाची आत्महत्या आणि आता भीमा कोरेगावची घटना या तीन घटना त्याची उदाहरणे आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे केली होती.

...Read More

V. S. News
भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हिंसाचारात हात – मायावती

व्हीएस न्यूज – महाराष्ट्रासह देशभर भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचे पडसाद उमटले असून भीमा कोरेगावच्या घटनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जबाबदार धरले आहे. तर महाराष्ट्र सरकारवर बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावतींनी टीका केली आहे.

भीमा कोरेगाव हिंसाचार रोखता आला असता. सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना महाराष्ट्र सरकारने करायला हव्या होत्या. भाजपचे सरकार महाराष्ट्रात आहे. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जातीवादी संघटनांचा या हिंसाचारामागे हात असल्याचे मायावतींनी म्हटले आहे. सोमवारी घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!