Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
बॅटमिंटनपटू सिंधुने ‘केबीसी’त जिंकलेले २५ लाख केले दान

व्हीएस न्यूज – बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधु हिने ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमातून जिंकलेले बक्षीसाचे २५ लाख रुपये एका कर्करोग रुग्णालयाला दान केले आहेत. कर्करोग पीडित रुग्णांना ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावणाऱ्या आणि पद्मश्री, राजीव गांधी खेलरत्न आणि अर्जून पुरस्काराने सन्मानित असलेल्या सिंधुची देणगी जीवदान ठरू शकते. ‘कोन बनेगा करोडपती’मध्ये तिने यंदा २५ लाख रुपये जिंकले होते.

तेलुगु अभिनेता तथा बस्वतरकम इंडो अमेरिका कर्करोग रुग्णालय आणि संशोधन संस्थेचे अध्यक्ष एन. बालाकृष्णन याच्याकडे सिंधुने २५ लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द केला. ज्येष्ठ कलाकार तथा तेलुगु देसम पक्षाचे संस्थापक एन.टी. रामाराव यांचा एन. बालाकृष्णन हा मुलगा आहे. बालाकृष्णनने सिंधुच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. सिंधुचा निर्णय कर्करोग विरोधात लढण्यासाठी इतरांना प्रेरणा देणारा ठरणार आहे, असेही त्याने म्हटले.

...Read More

V. S. News
न्यायालयाच्या अंतर्गत यंत्रणेमार्फत करा तक्रारींचे निवारण – विकास सिंह

व्हीएस न्यूज - सर्वोच्च न्यायालयाच्या ४ न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या कारभाराविषयी केलेल्या भाष्यावर माजी अतिरिक्त महाधिवक्ता विकास सिंह यांनी चिंता व्यक्त केली आहे. न्यायालयाच्या अंतर्गत यंत्रणेमार्फत सर्वोच्च न्यायालयाच्या कारभाराविषयी असलेल्या तक्रारींचे निवारण करण्याची गरज असल्याचेही विकास सिंह म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाबाबत जी बाब समोर आली आहे ती अत्यंत गंभीर बाब आहे. कुठलाही राजकीय नेता न्यायालय प्रशासनाबाबत असलेल्या समस्यांवर योग्य तोडगा काढू शकणार नाही. याशिवाय परिस्थिती आणखी बिघडवण्याचा ते प्रयत्न करतील. राजकीय नेत्यांवर ही समस्या सोडवण्यासाठी अवलंबून न राहता न्यायालयाच्या अंतर्गत यंत्रणेमार्फत या समस्येचे निराकरण केले पाहिजे, असे मत विकास सिंह यांनी व्यक्त केले आहे. लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ सर्वोच्च न्यायालय असून सर्वांनी त्याचे संरक्षण करायलाच हवे. पण पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाबाबत भाष्य केल्याने सामान्य जनतेच्या मनात संशय निर्माण झाला. न्यायपालिकेसाठी हे हितकारक नाही, असेही सिंह पुढे म्हणाले.

...Read More

V. S. News
बीटकॉईन हे एक मायाजाल - वॉरेन बफे

व्हीएस न्यूज - गुंतवणूकीच्या दुनियेचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे वॉरेन बफे यांनी नुकताच बिटकॉईनच्या संदर्भात एक खुलासा केला. जर बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केली असेल तर सावध रहा कारण हे एक मायाजाल असून हा फुगा केव्हाही फूटू शकतो, असा इशारा बफे यांनी गुंतवणूकदारांना दिला आहे.

बफे यांच्या मते, अधिक काळ ही क्रिप्टोकरंसी टिकू शकणार नाही. या प्रकारात आपण स्वत:देखील गुंतवणूक करत नाहीत. गुंतवणूकदारांचे यात मोठे नुकसान होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. या बाबतीत भारत सरकारनेसुद्धा सूचना देत धोक्याची घंटा वाजवली आहे.

एकीकडे क्रिप्टोकरंसी यशस्वी होत असताना जगभरात मात्र याविषयी धोक्याची घंटा वाजवण्यात येते आहे. भारतासकट अनेक देशांत याला कायदेशीर मान्यता देण्यात आलेली नाही. दक्षिण कोरियाने बिटकॉईनवर बंदी घातलेली आहे.

...Read More

V. S. News
‘व्हर्च्युअल आयडी सह आधार क्रमांकही वापरता येणार’

व्हीएस न्यूज - आधार क्रमांकाऐवजी व्हर्च्युअल आयडीची सुविधा होणार असली तरी ती अनिवार्य नसल्याचे आधार कार्यक्रम चालवणाऱ्या युआयडीएआय अर्थात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. लोकांना आधार क्रमांक द्यायचा असेल तर ते देऊ शकतात असे युआयडीएआयच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण पांडे यांनी सांगितले.

आधारची माहिती सुरक्षित रहावी यासाठी युआयडीएआय आभासी ओळख क्रमांक अर्थात व्हर्च्युअल आयडी योजना आणणार असून ती जूनपासून अनिवार्य करण्यात येणार असल्याचे वृत्त होते. मात्र, या योजनेचा विचार असला तरी ती अनिवार्य नसेल असे युआयडीएआयने स्पष्ट केले आहे. व्हर्च्युअल आयडीची सुविधा १ मार्चपासून उपलब्ध होणार आहे. त्यानंतर १ जूनपासून ती अनिवार्य करण्यात येणार असल्याचे माध्यमांतील वृत्तांतून सांगण्यात आले होते. एनडीटीव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.

अजय पांडे म्हणाले, सुरक्षेच्या मुद्द्यावरून आपल्याला संवेदनशीर असायला हवे त्याचबरोबर आव्हानांसाठी देखील तयार रहायला हवे. लोकांना आपल्या माहितीच्या सुरक्षेसाठी व्हर्च्युअल आयडीचा पर्याय देण्यात आलेला असला तरी लोकांना गरज पडल्यास त्यांचा आधार क्रमांकही वापरता येणार आहे. आधारची माहिती लीक होण्याच्या प्रकरणाबाबत पोलीस चौकशी करीत आहेत. याप्रकरणी लॉग-इनचे अधिकार राज्यांतील युआयडीएआयच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

...Read More

V. S. News
लोकसभेच्या निवडणुका याच वर्षी होतील – ॲड. प्रकाश आंबेडकर

व्हीएस न्यूज - दलित आणि ओबीसी समाज भाजप सरकारवर नाराज आहे. तरुणांमध्ये तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल असंतोष धुमसत आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुका या वर्षांतच होतील आणि त्यात भाजपचा दारुण पराभव होईल, असे भाकीत भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी व्यक्त केले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा रिपब्लिकन ऐक्याचा प्रस्ताव फेटाळून लावताना, आठवले यांच्यात नेतृत्वाची बौद्धिक क्षमताच नसल्याची कठोर टीकाही त्यांनी केली. ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ आयोजित ‘आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात ते बोलत होते.

भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर दलित राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी देशातील सध्याच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थितीबद्दल आपली ठोस व अभ्यासपूर्ण मते मांडली. ‘आंबेडकरी चळवळ चालविण्यासाठी मी सक्षम आहे, यापुढील राजकारणाचा राष्ट्रीय अजेंडा माझा असेल,’ असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. सार्वत्रिक निवडणुका याच वर्षी होतील आणि २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसची जी अवस्था झाली, तशी भाजपची होईल, असेही ते म्हणाले.

भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी अनुयायांवर हल्ले करण्यात आले, दगडफेक,जाळपोळ करण्यात आली, त्याच्या निषेधार्थ आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंदच्या वेळी नागरिकांचे हाल झाले, याकडे आंबेडकर यांचे लक्ष वेधले असता, त्यांनी बंद पुकारण्यामागची भूमिका स्पष्ट केली. भीमा कोरेगावमधील हल्ल्यानंतर दलित समाजातून तीव्र उद्रेक बाहेर आला. त्याला महाराष्ट्र बंदची हाक देऊन संघिटत करुन दलितांच्या भावनाना मोकळी वाट करुन दिली. तसे केले नसते तर हा उद्रेक हाताबाहेर जाऊन त्याचे विपरित परिणाम झाले असते, अशा शब्दात त्यांनी बंदचे समर्थन केले.

...Read More

V. S. News
बीडमध्ये एकाच वेळी तब्बल ३०६ मुलींच्या नामकरणाचा सोहळा

व्हीएस न्यूज - बीड जिल्ह्याने स्त्री भ्रूणहत्येचा कलंक पुसून नाव कमावले असून बीडमध्ये स्त्री जन्माचे स्वागत करा, बेटी बचाओ, बेटी पढाओ’या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत एकाच वेळी तब्बल ३०६ मुलींच्या नामकरणाचा सोहळा पार पडला. हा उपक्रम स्व. झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या १४ व्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात राजयोग फाउंडेशन व कुटे ग्रुप फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. विशेष म्हणजे ३०१ मुलींची नावनोंदणी झालेली असताना ऐनवेळी एकूण ३०६ मुलींचे नामकरण झाले. या मुलींचा जन्म १५ ऑक्टोबर २०१७ ते १ जानेवारी २०१८ या कालावधीत झालेला आहे.

सजवलेला भव्य मंडप, ३०१ पाळणे, बारशाची गीते अशा उत्साहात ३०१ मुलींच्या आत्यांनी कानात कुर्रर्रर्र करत बारसे केले. कीर्तन महोत्सवाचा समारोप अशा अनोख्या पद्धतीने झाला. गतवर्षी सोहळ्यात १०१ मुलींचे सामूहिक नामकरण केले होते. पुढील वर्षी ५०१ मुलींचेनामकरण करण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. पाळणा, कपडे, खेळणी,चांदीचे वाळे मुलींना भेट देण्यात आले. आईंना साडीचोळीचा आहेर व फेटा बांधून हळदी-कुंकू करत स्वागत झाले. लंडनच्या ‘वंडर बुक ऑफ रेकॉर्ड’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने सोहळ्याची नोंद घेतली. ‘मुलींचा असा सामूहिक नामकरण सोहळा जगात कुठेही झालेला नाही, असे कौतुक समन्वयकांनी केले.

...Read More

V. S. News
विकास कामांसाठी मुख्यमंत्री, अर्थमंत्री पैसेच देत नाहीत!

व्हीएस न्यूज - पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आपलेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांना मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री निधी उपलब्ध करून देत नाहीत. मी काय करू, असे हताश उद्गार त्यांनी काढले.

कन्नड तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांना निधी मिळण्याच्या मागणीसाठी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी बबनराव लोणीकर यांना औरंगाबाद विमानतळावरच घेराव घातला. ४ वर्षांपासून पाणीपुरवठा योजना रखडल्या आहेत. योजनेची कामे कधी सुरू करणार, असा सवाल करीत ग्रामपंचायत सदस्यांनी लोणीकर यांना धारेवर धरले. तेव्हा लोणीकर यांनी अत्यंत हतबला व्यक्त केली. ते म्हणाले की, कुठलेही काम सुरू झालेले नाही. कर्जमाफीमुळे कामे होण्यास विलंब होतो आहे. ४ वर्षांपासून कर्जमाफी सुरू आहे काय, असा सवाल हर्षवर्धन जाधव यांच्यासह शेतक-यांनी केला. त्यावर ते म्हणाले, विधानसभा अध्यक्षांच्या मतदारसंघातील देखील काम झालेले नाही. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री पैसे देत नाहीत. त्यांनी पैसे दिल्याशिवाय मी तरी काय करू शकतो. विधानसभा अध्यक्षांचे काम होत नव्हते. ते स्वत: मुख्यमंत्र्यांना बोलले होते. १०० कोटी शहरनिहाय दिले जातात. २०० कोटी एका जिल्ह्याला मिळणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले होते. ७०० कोटी रुपयांची घोषणा पाणीपुरवठा योजनांसाठी झाली; परंतु प्रत्यक्षात २१० कोटीच मिळाले, अशी वस्तुस्थिती पाणीपुरवठामंत्र्यांनी मांडली. उन्हाळ्याच्या तोंडावर हा सगळा प्रकार घडल्यामुळे आगामी काळात ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण यंदाही कायम राहणार असल्याचे दिसते.

शासनाने ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिलेला आहे, असे असतानाही औरंगाबाद जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे पाणीपुरवठा योजनांची कामे रेंगाळली आहेत. त्यामुळे अशा अधिका-यांवर कारवाई करण्याचे संकेत पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी ७ जानेवारी रोजी जालना येथे घेतलेल्या बैठकीत दिले होते. त्यानंतर दोन दिवसांतच त्यांनी मुख्यमंत्री, अर्थमंत्री निधी देत नसल्याचे सांगून सरकारला घरचा अहेर दिला.

...Read More

V. S. News
राज्यातील कौटुंबिक न्यायालयात ३४ हजार दावे प्रलंबित

व्हीएस न्यूज - राज्यातील विविध कौटुंबिक न्यायालयांमध्ये ३४ हजार ३५९ दावे प्रलंबित आहेत. प्रलंबित असलेल्या दाव्यांच्या आकडेवारीमध्ये पुणे कौटुंबिक न्यायालय राज्यात तिस-या क्रमांकावर आहे. पुण्यातील कौटुंबिक न्यायालयामध्ये सध्या ५,१९७ दावे प्रलंबित आहेत, तर सर्वाधिक दावे मुंबईच्या वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत.

राज्यातील कौटुंबिक न्यायालयामध्ये सध्या ३४ हजार ३५९ दावे प्रलंबित आहेत. यामध्ये दिवाणी स्वरूपाचे २५,१८६ दावे, तर फौजदारी स्वरूपाचे ९,१७३ दावे प्रलंबित आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी दाखल केलेल्या दिवाणी स्वरूपाचे २०३, फौजदारी स्वरूपाचे २८५ असे मिळून एकूण ४८८ दाव्यांचा समावेश आहे. महिलांनी दाखल केलेल्या दिवाणी स्वरूपाच्या १०,६०१, फौजदारी स्वरूपाच्या ८,०५८ अशा मिळून एकूण १८ हजार ६५९ दाव्यांचा समावेश आहे.

प्रलंबित असलेल्या दाव्यांमध्ये दहा वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेले २९ दावे आहेत, तर पाच ते दहा वर्षांच्या कालावधीत प्रलंबित असलेले ६१४ दावे आहेत. दोन ते पाच वर्षे या कालावधीत प्रलंबित असलेले ७,४७७ दावे प्रलंबित आहेत. दोन वर्षांपेक्षा कमी काळ प्रलंबित असलेले २६,२३९ दावे राज्यात प्रलंबित आहेत. पुणे कौटुंबिक न्यायालयामध्ये सध्या ५,१९७ दावे प्रलंबित आहेत.

यामध्ये महिलांनी दाखल केलेले दिवाणी स्वरूपाचे १६५८, फौजदारी स्वरूपाचे १०२० अशा मिळून २,६७८ दाव्यांचा समावेश आहे. दहा वर्षाहून अधिक काळ पुण्यात प्रलंबित असलेले दावे सध्या केवळ पाच आहेत. पाच ते दहा वर्षे या कालावधीत प्रलंबित असलेल्या १२२, दोन ते पाच वर्षे या कालावधीत प्रलंबित असलेले ११४८, तर दोन वर्षांहून कमी काळ प्रलंबित असलेले ३९२२ दावे सध्या प्रलंबित आहेत.

पुण्यातील कौटुंबिक न्यायालयासाठी उभारण्यात आलेल्या नवीन इमारतीत कौटुंबिक न्यायालयाचे स्थलांतर करण्यात आल्यानंतर न्यायालयात दाखल होणा-या दाव्यांची संख्या गेल्या काही महिन्यांत वाढली आहे. शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाजवळ कौटुंबिक न्यायालयाची नवीन इमारत उभारण्यात आली आहे. शिवाजीनगर न्यायालयात वकिली करणा-या वकिलांना यापूर्वी असलेल्या कौटुंबिक न्यायालयात ये-जा करताना अडचणी येत असत. मात्र, हा प्रश्न सोडवण्यात आला आहे.

कौटुंबिक न्यायालयात सध्या दररोज १५ ते १६ दावे दाखल होत आहेत. न्यायालयात वाढत्या दाव्यांची संख्या लक्षात घेऊन न्यायाधीशांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे, असे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गणेश कवडे यांनी सांगितले.

...Read More

V. S. News
हेलिकॉप्टर अपघातातून पुन्हा बचावले फडणवीस


व्हीएस न्यूज - सुदैवाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हेलिकॉप्टर अपघात टळला. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर मुंबईजवळील भाईंदरमध्ये लँडिंग करत असताना हा प्रकार घडला. या हेलिकॉप्टरच्या मार्गात केबल आल्याने ते पुन्हा वर घेण्यात आले. सतर्कतेमुळे हा अपघात सुदैवाने टळला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध कामांच्या भूमिपूजनासाठी मीरा भाईंदर येथे आले होते. पण त्यावेळी त्यांचे हेलिकॉप्टर केबलमुळे इतरत्र भरकटले आणि इमर्जन्सी लँडिंग करावे लागले असल्याचे सांगितले जात आहे. पण या घटनेला ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी दुजोरा दिलेला नाही. त्यांनी कॅमेरासमोर बोलण्याचे टाळले आहे. हे हेलिकॉप्टर आमदार नरेंद्र मेहता यांच्या शाळेच्या प्रांगणात उतरवण्यात आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोटारीने प्रयाण केले.

...Read More

V. S. News
जल्लीकट्टूत सहभागासाठीही आधार कार्ड हवे

व्हीएस न्यूज – तामिळनाडूत पोंगलची धामधूम सुरू असतानाच गतवर्षी त्यांच्या पारंपारिक जल्लीकट्टू खेळावर घातलेल्या प्रतिबंधामुळे आंदोलने केली गेली होती. यंदा हा पारंपारिक खेळ पूर्ण सुरक्षा व नियम कायद्यानुसार लोकांना खेळता येणार आहे मात्र त्यासाठी या खेळात सहभागी होऊ इच्छीणार्‍या जल्लीकट्टूपटूंना आधारकार्ड सादर करावे लागणार आहे. मदुराईसमेत दक्षिण तमीळनाडूत हा खेळ मोठ्या प्रमाणावर खेळला जातो.

यंदा १४ जानेवारी रोजी हा खेळ अवनियापुरम, १५ जानेवारीला पालमेडू व १६ जानेवारीला अलंगानल्लूर येथे साजरा केला जात आहे. त्यासाठी सांड व जल्लीकट्टूत सांडाशी झुंजणारे वीर यांनी जोरदार तयारी सुरू केली असून अनेक ठिकाणी त्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. खेळाडूंनी नोंदणीसाठी लांब रांगा लावल्या आहेत. मात्र त्यांच्यासाठी आधारकार्ड सादर करणे यंदा बंधनकारक केले गेले आहे. त्यासोबत निवास प्रमाणपत्र व दोन पासपोर्ट साईज फोटोही द्यायचे आहेत. आधारकार्ड सक्ती केल्याने खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. १६ तारखेच्या खेळाचे उदघाटन मुख्यमंत्री ई.के.पलानीस्वामी करणार आहेत. या खेळात २० ते ४० वयोगटातील खेळाडूच सहभागी होऊ शकणार आहेत.

...Read More

V. S. News
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना डी.लिट पदवी प्रदान

व्हीएस न्यूज कलकत्ता विद्यापीठाकडून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मानद डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आल्यामुळे आता त्या डॉ. ममता बॅनर्जी झाल्या आहेत. डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी.लिट) पदवी त्यांना देण्यात आली आहे.

पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांच्या हस्ते ही पदवी त्यांना देण्यात आली. विद्यापीठाने ममता यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला आहे. याच विद्यापीठाच्या त्या माजी विद्यार्थिनी आहेत. ममता यांनी पदवी प्रदानाच्या भाषणात असहिष्णुतेवर भाष्य केले. त्या म्हणाल्या,की देशात असहिष्णुता वाढत आहे. इतिहासाची विकृती केली जात आहे. विविधता हीच देशाची ओळख आहे. त्याचा आपण सन्मान केला पाहिजे,असे त्या म्हणाल्या.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!