व्हीएस न्यूज – सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मुलींच्या कपड्यांवर, नोकरीवर आणि वैवाहिक आयुष्यावर निर्बंध लादणाऱ्यांना चपराक लगावली असून सर्वोच्च न्यायालयाने सज्ञान मुलीला तिच्या इच्छेनुसार जीवन जगण्याचा अधिकार आहे, असे मत मांडले.
सर्वोच्च न्यायालयात तिरुअनंतरपुरममधील एका महिलेने तिच्या मुलीचा ताबा मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार संबंधित महिलेची १९ वर्षांची मुलगी असून ती तिच्या वडिलांसह कुवेत येथे राहते. पण पतीने माझ्या मुलीवर दबाव टाकल्यामुळेच कुवेतला ती निघून गेल्याचा त्या महिलेने केला होता. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर शुक्रवारी निर्णय दिला. महिलेची मुलगी १९ वर्षांची असून न्यायालयात तिने स्वतः सांगितले होते की तिला कुवेतला वडिलांकडे राहायचे आहे, याकडे खंडपीठाने लक्ष वेधले.
सज्ञान असलेल्या मुलगी किंवा मुलाला त्यांच्या इच्छेनुसार जीवन जगण्याचा अधिकार असून या प्रकरणातील मुलगी सज्ञान असून तिला संविधानाने स्वातंत्र्य दिले असल्यामुळे आई किंवा वडिलांनी यात भावनिक कारण पुढे करुन केलेला हस्तक्षेप अमान्यच असेल, असे न्यायालयाने सांगितले.
व्हीएस न्यूज - नवीन वर्षाचा जरा वेगळा संकल्प फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी जाहीर केला आहे. त्यांनी फेसबुकचा दुरुपयोग होण्यापासून रोखण्याचा संकल्प केला आहे. झुकेरबर्ग २००९ पासून नवीन वर्षाचा संकल्प जाहीर करत आहेत. एका पोस्टद्वारे फेसबुकवरच त्यांनी २०१८चा संकल्प जाहीर केला आहे. यंदाचा संकल्प आधीच्या संकल्पांपेक्षा वेगळा आहे.
फेसबुकवरून अमेरिका आणि इतर देशांच्या निवडणुकीत तथाकथित खोट्या बातम्या पसरल्या गेल्या, अशी टीका फेसबुकवर झाली. विशेषत: २०१६मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत रशियाच्या बाबतीत राजकीय जाहिराती फेसबुकवर प्रसिद्ध झाल्या होत्या.
यावर्षीच्या काही ‘महत्त्वाच्या मुद्द्यांची’ यादी झुकेरबर्ग यांनी तयार केली आहे. यावेळी शिवीगाळ आणि द्वेषापासून लोकांना दूर ठेवणे, सरकारकडून होणाऱ्या हस्तक्षेपाविरोधात आवाज उठवणे, तसेच फेसबुकवर घालवलेला वेळ कसा सत्कारणी लावता येईल याचा विचार करणे अशा मुद्द्यांवर विचार होईल, असे त्यांनी सांगितले आहे.
व्हीएस न्यूज - फेसबुकवरील ग्राहकांचा वापर अधिक सहज व्हावा याकरिता यामध्ये अपडेट्स दिले जात असून इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये आता फेसबुक नवा अपडेट आणण्यासाठी सज्ज झाला आहे.
आजकाल ‘स्टोरीज’ हा नवा आणि इंटरेसटिंग प्रकार खूपच चर्चेमध्ये आहे. हा पर्याय व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुक अशा तिन्ही प्लॅटफॉर्ममध्ये आहे. पण यांना आता एकमेकांशी लिंक करण्याचा प्रयत्न फेसबुक करणार आहे. त्यामुळे इंस्टाग्रामची स्टोरी आता थेट व्हॉट्सअॅपवरही स्टेट्समध्ये दिसण्यास शक्य होणार आहे. याबाबत फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार ‘इंस्टाग्राम स्टोरीज’ आणि ‘ व्हॉट्स अॅप स्टेट्सचा वापर सुमारे ३० कोटी युजर्स करतात. ग्राहकांना स्नॅपचॅटप्रमाणे सुविधा देण्यासाठी फेसबुकने इंस्टाग्रामचा पर्याय आणला. यामध्ये सतत नवनवे अपडेट्स देण्यात आले आहेत. सध्या स्नॅपचॅट युजर्सची संख्या १७.३ कोटी आहे.
फेसबुकचा १२ वर्षाहून लहान असणार्या युजर्समध्ये वापर अधिक सुकर बनवण्यासाठी पॅरेंटॅल कंट्रोलचा ऑप्शन देण्यात आला आहे. फेसबुक मेसेंजर अॅपवरील नियंत्रण यानुसार पालकांकडे राहणार आहे. ६-१२ वयातील मुलांसाठी नवे अॅप बनवण्यात आले आहे. पालक मुलांची कॉन्टॅक्ट लिस्ट कंट्रोल करू शकणार आहेत.
व्हीएस न्यूज - मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडमध्ये पार पडलेल्या महिला विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. साखळी फेरीपासून मोठमोठ्या संघांना पराभवाचा धक्का देत मिताली राजच्या टीम इंडियाने सर्वांना आश्चर्यचकीत केलं होतं. यानंतर जगभरातून मितालीच्या नेतृत्वावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.
मिताली राजने केलेल्या कामगिरीनंतर तिच्याकडून भारतीय क्रीडा रसिकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. बॉलिवूडचा किंग शाहरुखानच्या मते, मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय पुरुष संघाला प्रशिक्षण देण्याचा विचार करावा. स्टार प्लस या वाहिनीवर टेड टॉक या शोमध्ये मितालीशी बोलत असताना शाहरुखने आपलं मत व्यक्त केलं.
शाहरुखने व्यक्त केलेल्या मतावर बोलताना मिताली राज म्हणाली, “मैदानावर असताना मी १०० टक्के कामगिरी करण्याचा प्रयत्न करते. संपूर्ण संघ मिळून ट्रॉफी कशी जिंकता येईल याकडे माझा भर असतो. आणीबाणीच्या प्रसंगात स्वतःला शांत ठेवण्यासाठी मी म्हणूनच पुस्तक वाचते. त्यामुळे या सर्व गोष्टी मला चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरित करत असल्याचं”, मिताली राज म्हणाली. महिला वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा (६१९०) नावावर असलेल्या मिताली राजचा यंदा आयसीसीच्या, महिलांच्या वन-डे संघात समावेश करण्यात आला होता. मिताली राज व्यतिरीक्त एकता बिश्त आणि हरमनप्रीत कौर यांनाही आयसीसीच्या वन-डे संघात स्थान मिळालं आहे.
व्हीएस न्यूज - कोरेगाव भीमाच्या घटनेनंतर राज्यभरात तीव्र हिंसक पडसाद उमटले होते. त्यानंतर कोरेगाव भीमामध्ये सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सर्वजण गुण्यागोविंदाने एकत्र रहात आहोत आणि यापुढेही राहणार आहोत,अशी भावना व्यक्त केली. एकीची भावना बोलून दाखवित त्यांनी सामाजिक ऐक्याला बाधा आणणाऱ्या प्रवृत्तीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. दंगल गावाबाहेरील कार्यकर्त्यांनी व संघटनांनी गावात केल्याचा आरोपही यावेळी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये गावातील महिला व मुलींना मारहाण झालेल्यांवर कारवाई करावी, दंगलीतील मृत कुटुंबीयांच्या नातेवाईकाला १ कोटींची नुकसान भरपाई करावी, अशी मागणी केली. हा हिंसाचार पोलिसांनी व्यवस्थित बंदोबस्त ठेवला नसल्यामुळे झाल्याचा गंभीर आरोप कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. सरकारने येथील कार्यक्रमाची कल्पना असूनही हलगर्जीपणा दाखविल्याची टीकाही त्यांनी केली.
जो वाद वढू येथील समाधीवरून झाला त्याचे पडसाद उमटू नये म्हणून कोरेगाव भीमा गाव त्यादिवशी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता, असे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कोरेगाव भीमाचे नाव नाहक बदनाम झाले आहे. घटनेनंतर ५ दिवस उलटूनही एकही मंत्री गावात फिरकलेला नाही, यामुळे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कोणीतरी येऊन २ समाजात तेढ निर्माण करत आहे, ज्यांनी हे घडवून आणले त्यांच्यावर योग्य कारवाई व्हावी, अशी मागणी कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. कोरेगाव भीमा ग्रामपंचायतील गेली ३ दिवस वीज-पाणी नाही. मात्र गावाबाबत खोटे व्हिडिओ व्हायरल केले जात आहे. हे प्रकार थांबवा, असे त्यांनी आवाहन केले आहे.
व्हीएस न्यूज - पुढील महिन्यापासून गोव्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे दंडनीय अपराध ठरणार असल्यामुळे समुद्रकिनारी बसून निवांत दारु पिण्यासाठी गोव्याचा मार्ग धरणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होणार आहे.
या नव्या नियमाची घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केली असून विशेष म्हणजे हा नियम दारुच्या सेवनामुळे नाही, तर दारुच्या रिकाम्या बाटल्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी करण्यात आला आहे. दारुच्या रिकाम्या बाटल्यांचा खच गोव्यात सार्वजनिक ठिकाणी पडल्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाची गोवा सरकारने गंभीर दखल घेतली आहे.
पर्रिकरांनी ही माहिती पणजीमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या उद्धाटनानंतर दिली. मुख्यमंत्र्यांनी येत्या १५ दिवसात कायद्यात तरतूद करुन त्याची फेब्रुवारी महिन्यापासून कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. गोव्यात डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच पर्यटकांची गर्दी होते. देशाच्या विविध भागातून आणि परदेशातून नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आलेले पर्यटक दारुच्या दुकानांसमोर तसेच बीचवर दारु पिऊन बाटल्या तिकडेच टाकून जात असल्याचे आढळल्यामुळे कचरा उचलून साफ सफाई करण्याचे सरकारी यंत्रणेचे काम वाढले आहे.
व्हीएस न्यूज - माझ्यावर निराधार आरोप करीत प्रकाश आंबेडकर यांनी अटकेची मागणी केली असून याबाबत भीमा-कोरेगाव प्रकरणाची राज्य शासनाने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असे निवेदन शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांनी दिले आहे.
आपल्या निवेदनात गुरुजींनी म्हटले आहे, की मी १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीवेळी उपस्थित होतो व कारणीभूत आहे असे विधान केले आहे. प्रत्यक्षात मी त्या दिवशी सांगली मुक्कामी असताना माझ्यावर हा आरोप त्यांनी केला आहे. याकूब मेमनची वाट मला दाखविण्याची मागणी केली आहे. आसेतू सारा हिंदुस्थान एकरूप करण्याचा प्रयत्न मी व माझे कार्यकर्ते करीत असताना हे करण्यात आलेले आरोप निराधार आहेत. याची शासनाने सखोल चौकशी करावी.
व्हीएस न्यूज: ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सिंधुदुर्गातील सोळाव्या प्राथमिक शिक्षक अधिवेशनात शिक्षकांना शाळाबाह्य कामातून लवकरच मुक्त करणार असल्याची घोषणा केली आहे. सध्या शौचालय सर्वेक्षण, निवडणूक आणि इतर शाळाबाह्य शिक्षकांना कामे करावी लागतात. शिक्षकांना ही कामे भविष्यात करावी लागणार नाहीत असेही पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले आहे.
तसेच राज्यातील मराठी शाळांसाठी आयसीएसई आणि सीबीएससी बोर्डाप्रमाणेच आंतरराष्ट्रीय स्कूल बोर्डाची निर्मिती केली जाणार असून यासाठी राज्यातील शंभर शाळा पहिल्या टप्प्यात निवडण्यात आल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटले आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांप्रमाणे ग्रामीण भागातल्या हुशार मराठी विद्यार्थ्यांनाही आंतराष्ट्रीय ज्ञान मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याच तावडे म्हणाले आहेत. तावडे सिंधुदुर्गात झालेल्या प्राथमिक शिक्षक अधिवेशनात बोलत होते.
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी यावेळी शिक्षकांना अधिवेशनाला सिंधुदुर्गात आला असाल तर परत जाताना जवळ असलेल्या गोव्याला जरूर जा पण चुकीचे काही करु नका असा सल्ला दिला आहे. तर गोव्यात जाणाऱ्या शिक्षकांनी आपल्या ड्रायव्हरला सावध ठेवण्यास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नारायण राणे यांनी वर्गात मुलांवर चांगले संस्कार करण्याची अपेक्षा असलेल्या शिक्षकांबाबत चांगले ऐकू येत नसल्याचे सांगत शिक्षकांना उपदेशाचे डोसही पाजले आहेत.
व्हीएस न्यूज - आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली बनला आहे. आयपीएलचे सामने विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू या संघातून खेळतो. विराट कोहलीला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने आयपीएलसाठी १७ कोटी रूपये दिले आहेत. कर्णधार कोहलीला टीममध्ये कायम ठेवण्यात आयपीएल २०१८च्या रिटेन डेडलाइन वर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने कुठलीही कसर सोडली नाही. विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूसोबत खेळायचे १७ कोटी रूपये घेऊन रायझिंग पुणे सुपरजायंट्सने १४.५ कोटी देऊन विकत घेतलेल्या इंग्लंडच्या बेन स्टोक्सला मागे टाकले आहे. १७ कोटी रूपये देऊन विराट कोहलीला रिटेन करण्यात आले आहे. बेन स्टोक्सला मागे टाकण्यात विराट कोहलीनंतर चेन्नई सुपर किंग्सच्या महेंद्र सिंह धोनी आणि मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माचा सहभाग आहे. धोनी व रोहित शर्माला त्यांच्या टीमने १५ कोटी रूपयात रिटेन केले आहे.
खेळाडूंना रिटेन करण्यावरून बरीच चर्चा रंगली होती, पण ज्या खेळाडुंची जास्त चर्चा होती त्याच खेळाडूंना संघामध्ये घेण्यात आले आहे. २०१८च्या नव्या सीझनसाठी निवडलेल्या आपल्या खेळाडूंची यादी सर्व आयपीएल संघांनी जाहीर केली आहे. खेळाडूंची ही यादी जाहीर करण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत डेडलाईन देण्यात आली होती. आता यानंतर २७ आणि २८ जानेवारी रोजी आयपीएलची बोली लागणार आहे. यंदा ४ ते २७ एप्रिलदरम्यान आयपीएल स्पर्धा होणार आहे.
आयपीएलच्या ११व्या सीजनसाठी संघाने कायम न ठेवलेल्या खेळांडूंमध्ये गौतम गंभीरचे नाव प्रामुख्याने घेतले जात आहे. तर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची चेन्नईच्या संघात वापसी झाली आहे. स्टीव स्मिथला राजस्थान रॉयल्सच्या संघाने घेतले आहे. तर रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि बुमराह यांना मुंबई इंडियन्सच्या संघाने कायम ठेवले आहे. तीन-तीन खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय चेन्नई, बंगळूरु, दिल्ली आणि मुंबईच्या संघांनी घेतला आहे. तर हैदराबाद आणि कोलकाताच्या संघाने प्रत्येकी दोन खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. तसेच पंजाब आणि राजस्थानच्या संघाने प्रत्येकी एका खेळाडूला आपापल्या संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
व्हीएस न्यूज: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने उघडण्यात आलेल्या बोगस फेसबुक अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी सुरु असून आम्ही संबंधितांविरुद्ध न्यायालयीन कारवाई करूच, परंतु यावर स्वत: मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.
शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून त्यांचे देश आणि महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये मोठे योगदान असून जेव्हा राष्ट्रीय पातळीवर समस्या निर्माण होतात पवारांचा सल्ला त्या-त्यावेळी घेतला जातो. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी गुजरातमध्ये राष्ट्रीय आपत्ती आली त्यावेळी पवारांवर जबाबदारी सोपवली होती. या देशात दुसरी कृषीक्रांती घडवण्याचे काम माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली पवार यांनी केले, असेही ते म्हणाले.
आ. जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना भेटून देशहितासाठी शरद पवार यांच्यासारख्यांची हत्या केली, तरी पाप लागणार नाही, अशी पोस्ट टाकणा-या माथेफिरूविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. संध्याकाळी आरोपीवर उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. अशा पद्धतीची घाणेरडी पोस्ट मी माझ्या राजकीय जीवनात पाहिलेली नाही. अशा लोकांवर कारवाई करावी, असे मत आव्हाड यांनी व्यक्त केले.
व्हीएस न्यूज - लग्न होण्यापूर्वी एकमेकांशी गप्पा मारणाऱ्या एका तरुणीचा व तिच्या वाग्दत्त वराचा खून केल्याची घटना पाकिस्तानात घडली आहे. या दोघांना एका उद्यानात गप्पा मारताना मुलीच्या काकाने पाहिले होते. ऑनर किलिंगची ही ताजी घटना असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.
सिंध प्रांतातील नयी वाही गावात ही घटना घडली. नझीरन असे या दुर्दैवी मुलीचे नाव असून शाहीद या तिच्या भावी नवऱ्यासोबत ती गप्पा मारत होती. या दोघांना पाहून तिच्या काकाचा राग अनावर झाला, असे एक्स्प्रेस न्यूज या वृत्तपत्राने म्हटले आहे. या प्रकरणी मुलीच्या दोन काकांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
ऑनर किलिंगच्या घटना पाकिस्तानात सर्रास घडत असून त्यातील बहुतांश घटनांत महिलांचा बळी जातो. गेल्या एका दशकात दरवर्षी सरासरी 650 ऑनर किलिंग होतात, असे पाकिस्तानच्या मानव हक्क आयोगाने (एचआरसीपी) आपल्या अहवालात म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक घटना पोलिसांपर्यंत पोचत नसल्याने खरा आकडा खूप अधिक असल्याचा अंदाजही या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. पाकिस्तानात दहशतवादात बळी पडणाऱ्या नागरिकांपेक्षा तथाकथित अनैतिक वागणुकीबद्दल जवळच्या कुटुंबियांच्या हातून अधिक महिला बळी पडतात, असेही या अहवालात म्हटले आहे.
व्हीएस न्यूज - खासगी क्षेत्रातील येस बँकेने असे एटीएम वापरात आणले आहे ज्यासाठी ग्राहकाला डेबिट कार्ड अथवा पिन नंबरची आवश्यकता राहणार नाही.यासाठी बँकेने फिनटेक क्षेत्रातील स्टार्टअप नियरबाय टेक्नॉलॉजीबरोबर करार केला आहे. त्यानुसार बँकेला आधार आधारित एटीएम उपलब्ध करून दिली जाणार आहेत. याच्या माध्यमातून ग्राहक रिटेलर्स कडे पैसे जमा करणे, पैसे काढणे अशी सेवा घेऊ शकणार आहे.
स्मार्टफोनचा वापर करून कुणीही रिटेलर- ग्राहक आधार एटीएम, आधार बँक शाखा स्वरूपात वापरू शकणार आहे. त्यासाठी येस बँकेने नॅशनल पेमेंट कार्पोरेशनसह काम केले असून देशभरात ४० हजार टच पॉईंट दिले जाणार आहेत. या टच पॉईटवरून ग्राहक आधार नंबर व बोटांचे ठसे देऊन रोख काढणे, भरणे वा अन्य आर्थिक देवघेवीचे व्यवहार करू शकतील असे समजते. यासाठी रिटेलर्स ऑफ इंडिया बरोबरही बँकेने करार केला आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002