व्हीएस न्यूज - सिंगापूरमध्ये नवी क्रिकेट अकादमी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी उघडणार असून २० जानेवारीला सेंट पॅट्रिक स्कूलमध्ये या अकादमीचे ३६ वर्षीय धोनी उद्घाटन करणार आहे. त्याची परदेशात ही दुसरी अकादमी असेल. धोनी याबाबत बोलताना म्हणाला, खेळ हा कोणत्याही मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा असून तुम्हाला फिट राहण्याशिवाय जीवनात नेतृत्व तसेच अन्य पैलू शिकायचे असतील तर खेळ हे चांगले माध्यम आहे. मैदानावरचे खेळ प्रत्येक मुलाला खेळलेच पाहिजेत. धोनीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पहिली ग्लोबल क्रिकेट अकादमी अल कोज दुबईमध्ये सुरु केली होती. यासाठी त्याने पॅसिफिक स्पोर्ट्स क्लब आणि आरका स्पोर्ट्स क्लबसोबत भागीदारी केली होती.
धोनी स्वत: सिंगापूर क्रिकेट अकादमीसाठी करीकुलम डिझाईन करणार आहे. त्याच्यासोबत सिंगापूर राष्ट्रीय महिला संघाची कर्णधार जीके दिव्या असणार आहे. सर्व वयोगटातील मुलांना अनुभवी प्रशिक्षकांसह ईस्ट कोस्ट रोडवरील सेंट पॅट्रिक स्कूलस्थित ही अकादमी प्रशिक्षण देणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये यासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु झाली असून आतापर्यंत २०० मुलांनी आपली नावे नोंदवली आहेत.
व्हीएस न्यूज - इराणमधील प्राथमिक शाळांमध्ये इंग्लिश शिकवण्यावर बंदी घालण्यात आल्याचे वृत्त पाकिस्तानचे प्रमुख वृत्तपत्र डॉनने दिले आहे. त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार कमी वयात इंग्लिश शिकल्याने मुले पाश्चिमात्य संस्कृतीकडे आकर्षित होतात, असे मत इस्लामिक नेत्यांनी व्यक्त केले आहे. प्राथमिक शाळांमध्ये इंग्लिश शिकण्याविरुद्ध इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी आवाज उठवला होता. त्यानंतर या बंदीबाबतची घोषणा इराणच्या वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांनी केली. इराणची प्रमुख भाषा पारसी असून वयाच्या सहाव्या वर्षापासून येथील मुलांचे प्राथमिक शिक्षणाचे वय सुरु होते. या देशात इंग्लिश अधिकतर माध्यमिक विभागांमध्ये शिकवले जाते. १२ ते १४ वर्षातील वयोगटाच्या मुलांचा या विभागात समावेश असतो. मात्र इराणमधील काही प्राथमिक शाळांमध्येही इंग्लिश शिकवली जाते.
व्हीएस न्यूज : एकीकडे आपल्या ग्राहकांसाठी रिलायन्स जिओ नव-नवे प्लान्स लॉन्च करत आहे. तर, दुसरीकडे जिओने आपल्या प्राईम युजर्ससाठी एक वाईट बातमी दिली आहे. जिओची प्राईम मेंबरशिप ३१ मार्च २०१८ ला संपत आहे.
जिओ प्राईम मेंबरशिप २१ फेब्रवारी २०१७ रोजी मुकेश अंबानी यांनी लॉन्च केली होती. ३१ मार्च २०१७ ही मेंबरशिप घेण्याची शेवटची तारीख होती. कंपनीने त्यानंतर ही तारीख वाढवून १५ एप्रिल २०१७ केली होती. या प्राईम मेंबरशिपची वैधता १ वर्ष होती. जर तुम्ही १४ एप्रिल २०१७ रोजी मेंबरशिप घेतली असेल तर ३१ मार्च २०१८ रोजी तुमची मेंबरशिप संपेल. जिओ प्राईम मेंबरशिपसोबत ग्राहकांना जिओ अॅप्स म्हणजेच जिओ टीव्ही, जिओ म्युझिक, जिओ सिनेमासारख्या १०,००० रुपयांचे अॅप्स या सेवा मोफत मिळत होत्या. ग्राहकांनी यासाठी ९९ रुपये देत प्राईम मेंबरशिप घेतली होती. या मेंबरशिपसोबतच ग्राहकांना जिओचा एक बेस्ट प्लान खरेदी करावा लागला होता. अद्याप युजर्सला कंपनीकडून मेंबरशिप संपल्यावर काय करावे? याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सूत्रांच्या मते, ही मेंबरशिप चालू ठेवण्यासाठी युजर्सला पुन्हा प्लान खरेदी करावा लागणार आहे. पण त्याचसोबत जिओ प्राईम मेंबरशिपची रक्कम कंपनी वाढवू शकते. जिओ प्राईम मेंबरशिपची अट होती की, ३१ मार्च २०१८ रोजी संपणार आहे. आता युजर्सने जेव्हा कधीही मेंबरशिप घेतली असेल तरी ती ३१ मार्च रोजीच संपेल. कंपनी या मेंबरशिपची वैधता ३१ मार्चनंतर वाढवू शकते. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच नव्या प्लानच्या किंमतीतही वाढ होऊ शकते. असे झाल्यास युजर्सला जास्त पैसे खर्च करण्यास तयार रहावे लागेल.
व्हीएस न्यूज - अयोध्येला जागतिक शांतता शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींनी भेट दिली असून त्यांनी राम जन्मभूमी व बाबरी मशिद वाद सामंजस्याने सोडवण्यासाठी उपाय सुचविला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेला विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील जागतिक शांतता विद्यापिठाच्या ११ प्रतिनिधींनी भेट दिली. या शिष्टमंडळात नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू विजय भटकर, जागतिक शांतता विद्यापीठाचे प्रमुख विश्वनाथ कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू एस. एन. पठाण, ज्येष्ठ पत्रकार वेदप्रताप वैदिक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ राजेंद्र एंडे, माजी केंद्रीय मंत्री अरीफ मोहम्मद खान फिरोझ भक्त अहमद आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिराज कुरेशी यांचासमावेश होता. वर्षानुवर्षे सुरू असलेला हा वाद सामंजस्याने सोडवण्यावर या शिष्टमंडळाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत भर देण्यात आला.श्रीराम ह्युमॅनिटी बिल्डिंग या वादग्रस्त जागी बांधण्याचा या शिष्टमंडळाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे या ठिकाणाहून जगाला विश्व शांती व मानवतेचा संदेश मिळेल, असे या शिष्टमंडळाचे म्हणणे आहे.
व्हीएस न्यूज - विश्व विवेक फाऊंडेशनच्या वतीने कै. अशोक नावंदर यांच्या 21 व्या स्मृती दिनानिमित्त रविवार दि. 7 जानेवारीला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती नगरसेवक व विश्व विवेक फाऊंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक बाबू नायर यांनी प्रसिध्दीस दिले आहे. रविवारी सकाळी 9 वाजता निगडी प्राधिकरण सेक्टर 27 येथील संत तुकाराम उद्यान येथे खासदार अमर साबळे यांच्या हस्ते आणि लोक लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबीराचे उद्घाटन होणार आहे. रक्तदात्यांनी या शिबीरास उपस्थित राहणाचे आवाहन नायर यांनी केले आहे.
व्हीएस न्यूज - हिरा विकण्याची वेळ शिवाजीमहाराजांच्या वंशजावर म्हणजेच भोसल्यांवर आली होती. मुंबई गाठून त्यांनी हिऱ्याचा लिलावही सुरू केला. पण हे सर्वकाही माहेश्वरी समाजाच्या व्यापाऱ्याला बघवले नाही. लिलाव थांबवून त्याने भोसले कुटुंबाला ५० लाख रुपयांची मदत केली, असा दावा करत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी करत नव्या वादाला तोंड फोडले.
कलाग्राम येथे ‘महाराष्ट्र ट्रेड फेअर’चे महाराष्ट्र प्रदेश औरंगाबाद जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेतर्फे आयोजन करण्यात आले आहे. जाजू यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले त्या वेळी ते बोलत होते. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे,भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी हे वक्तव्य माहेश्वरी समाजाचे मोठेपण सांगताना केले. पण त्यांनी हिरा विकण्यासाठी गेलेला शिवाजी महाराजांचा ‘तो’ वारस कोण हे सांगितले नाही. त्यांनी फक्त ‘भोसले’ असाच उल्लेख केला.
कोणत्याही मातीत गेल्यावर तेथील समाजाशी एकरूप होऊन माहेश्वरी समाज व्यवसाय करतो. स्थानिकांच्या अस्मिताही जपतो. एकदा आपल्याकडील जुना अनमोल हिरा विकण्याची वेळ शिवाजी महाराजांच्या वंशजावर आली. हिरा विकण्यासाठी ते मुंबईच्या बाजारपेठेत आले. भोसले हिरा विकण्यासाठी स्वत: पुढे न जाता त्यांनी दुसऱ्याला पुढे केले. व्यापारी हिरा पाहून अचंबित झाले.
हिरा विक्रीसाठी ज्याने पुढे केला त्याला विचारले की, तुझ्यासोबत कोण आहे? त्यानंतर भोसले यांनी आपली ओळख दिली. हिऱ्याचा लिलाव काही वेळानंतर सुरू झाला. हिऱ्यासाठी ६२ लाख रुपयांपर्यंत बोली लागली होती. माहेश्वरी समाजाच्या एका व्यापाऱ्याने तेव्हा भोसले यांना बाजूला घेऊन तुम्हाला किती पैशांची गरज आहे, अशी विचारणा केली. भोसलेंनी ५० लाख रुपयांची गरज असल्याचे सांगितले. लगेच त्या व्यापाऱ्याने ५० लाख रुपये काढून त्यांना दिले. त्या बदल्यात भोसलेंकडून धनादेश घेतला नाही की कागदावर लिहून घेतले नाही. त्यानंतर भोसले यांनी लिलाव रद्द केला.
व्हीएस न्यूज - टेलिकॉम क्षेत्रातील चुरस रिलायंस जिओच्या आगमनानंतर अधिकच वाढली असून या क्षेत्रातील आपले अस्तित्त्व आणि ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी इतर टेलिकॉम कंपन्यांनी नवनव्या ऑफर्स आणल्या आहेत.
जिओने सुरूवातीला ‘हॅपी न्यू इयर’ प्लान अंतर्गत ग्राहकांना प्रतिदिन १ जीबी डाटा प्लान आणला होता. जिओ ग्राह्कांना आता अजून दोन ऑफरचा लाभ घेता येणार आहे. प्रतिदिन १ जीबी डाटा या प्लानची किंमत आता ६० रूपयांवरून ५० रूपये करण्यात आली आहे. १९९ ऐवजी आता २८जीबी डाटा चा प्लान १४९ रूपयात मिळणार आहे. या प्लानची व्हॅलिडीटी आता २८ दिवसांची आहे. ७०जीबी डाटा प्लानदेखील आता ३९९ ऐवजी ३४९ रूपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. या प्लानची व्हॅलिडीटी ७० दिवसांची आहे.
आता ग्राहकांना जिओ ५० % अधिक डाटा उपलब्ध करून देणार आहे. तुमच्या प्रत्येक दिवसाच्या डेटा प्लानची लिमिट यामध्ये वाढवण्यात आली आहे. ग्राहकांना पूर्वी मिळत असलेल्या १ जीबी डाटा आता या प्लानमुळे ५० % अधिक डाटा मिळणार आहे. आता नव्या प्लाननुसार ग्राहकांना १.५ जीबी डाटा मिळणार आहे. रिलायन्स जिओच्या नव्या प्लानचा फायदा ग्राहकांना ९ जानेवारीपासून घेता येणार आहे.
व्हीएस न्यूज – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला कमला मिल दुर्घटनेनंतर रूफ टॉप पार्ट्याना विरोध करणाऱ्यांच्या रुफला ‘टॉप’ आहे का? असा उपरोधिक टोला लगावला आहे.
शिवसेनेचा कमला मिल दुर्घटनेनंतर अनधिकृत बांधकामांवर करण्यात येणाऱ्या कारवाईला पाठिंबा आहे. पण बांधकामाच्या अधिकृततेची खातरजमा कारवाईपूर्वी करावी, असे उद्धव यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले आहे. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे कमला मिल दुर्घटना होण्याआधी कमला मिल परिसरात गेले होते, अशी चर्चा सुरू आहे. उद्धव यांनी यावर भाष्य करताना मंत्रालयाला आग लागली तेव्हा मुख्यमंत्री तिथे होते त्यामुळे आगीच्या दुर्घटनेला मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरणार का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. प्रशासनाला दुर्घटनेला जबाबदार आरोपींचा शोध घेण्याकरता बक्षीस जाहीर करण्याची नामुष्की ओढावली आहे. यामुळे प्रशासनाची दुरावस्था समोर आल्याचे उद्धव यांनी म्हटले आहे. तसेच दोषी आरोपी आहेत की दहशतवादी? असा सवाल उद्धव यांनी विचारला आहे.
व्हीएस न्यूज - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोरेगाव-भीमा येथील हिंसाचार प्रकरणी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली असून त्यांनी आज (शनिवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
ज्यांचा हात या प्रकरणात असेल त्यांच्यावर जरुर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आठवलेंना दिले आहे. पण कुणालाही अटक करण्याआधी सगळे पुरावे गोळा करणे आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. ते मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
व्हीएस न्यूज – राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने भारतात रोज होत असलेल्या सुमारे ३,६०० बालविवाहांची गंभीर नोंद घेत, राज्यांना ही सामाजिक कुप्रथा नष्ट करण्यासाठी अत्यंत कठोर धोरण अवलंबून २००६ च्या बालविवाह प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.
बालविवाहावरील विभागीय परिषदेत आयोगाचे सरचिटणीस अंबुज शर्मा यांनी सांगितले की, १८ वर्षांखालील मुलांचे विवाह ही देशाची समस्या बनत असून राष्ट्रीय पातळीवर कृती योजना ते थांबविण्यासाठी तयार करणे या परिषदेचा हाहेतू आहे. संबंधित संस्थांपुढे कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करताना असलेली आव्हाने आणि बालविवाहांचा शोध लावणे व त्याची नोंद करण्यासाठी निकष तयार करण्यावरही चर्चा होईल. जगात होणा-या बालविवाहांपैकी ४० टक्के बालविवाह एकट्या भारतात होतात. ३,६०० असे विवाह रोज लागतात, असे नॅशनल क्राइम रेकॉर्डस ब्युरोच्या (एनसीआरबी) हवाल्याने आयोगाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. प्रत्यक्षात मोजक्याच बालविवाहांची नोंद होते.
व्हीएस न्यूज – जो हिंसाचार भीमा कोरेगावमध्ये उसळला त्यामागे हिंदुत्त्ववादी संघटना होत्या असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी भोपाळमध्ये या प्रकरणातल्या दोषींना कठोरातली कठोर शिक्षा झाली नाही तर हिंदूंच्या घरातही हाफिज सईद जन्माला येतील अशी टीका केली.
भाजपविरोधात एक लाठी रॅली मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये महात्मा फुले परिषदेतर्फे माजी खासदार सुखलाल कुशवाह यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आयोजित करण्यात आली होती. प्रकाश आंबेडकरांचीही त्या लाठी रॅलीला हजेरी होती. त्यांनी हे वक्तव्य यानंतर झालेल्या भाषणात केले आहे. समाजवादीचे नेते शरद यादव यांचीही या कार्यक्रमात उपस्थिती होती. या मंचावरून देशातील मागासवर्गीय, दलित बांधव आणि आदिवासींनी सरकारविरोधात एकत्र आले पाहिजे असेही आवाहन करण्यात आले.
पोलिसांनी महाराष्ट्र सरकारच्या इशाऱ्यावरूनच दोषींना सोडून पीडितांवर कारवाई केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर ही सगळी कारवाई होते आहे असाही आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. महाराष्ट्र सरकारला भीमा कोरेगावच्या दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी आंबेडकरांनी त्यांच्या भाषणात केली. जर ही मागणी मान्य झाली नाही तर हिंदूंच्या घरातही हाफिज सईद जन्माला येतील हे विसरू नका असा इशाराही त्यांनी दिला.
व्हीएस न्यूज – १० रुपयांची नवीन नोट भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) प्रसिद्ध केली असून ही नोट लवकरच चलनात आणली जाणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे.
चॉकलेट ब्राऊन म्हणजेच आत्ताच्या १० रुपयांच्या नोटांपेक्षा थोड्या गडद रंगाची १० रुपयांची नवी नोट आहे. ओडिशा येथील जगप्रसिद्ध कोणार्क सूर्यमंदिराचे चित्र या नोटांच्या मागील बाजूवर आहे. समोरील बाजूस महात्मा गांधीचे चित्र असणाऱ्या सिरीजमधीच ही नोट असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
सरकारकडून मागील आठवड्यामध्ये नवीन नोटांच्या डिझाइनला होकार मिळाल्यानंतर आठवड्याभरात रिझर्व्ह बँकेने १०० कोटी रुपये किंमतीच्या नोटा छापल्या आहेत. याआधी २००५ साली १० रुपयांच्या नोटांच्या रचनेत बदल करण्यात आला होता. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये २०० रुपयांच्या आणि ५० रुपयांच्या नवीन नोटा आरबीआयने चलनात आणल्या होत्या. त्यानंतर अवघ्या पाच महिन्यांमध्ये आरबीआय पुन्हा या नव्या १० रुपयांच्या नोटा चलनात आणणार आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002